शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

वैफल्यग्रस्त विरोधकांच्या पोटात मळमळ, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल : कुठल्याही मुद्द्यावर चर्चेस सरकार तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:43 AM

सरकारच्या चहापानावर बहिष्काराची पाच वर्षांची पत्रे विरोधकांनी तयार ठेवली आहेत. दरवेळी त्यातील एक काढतात. खरे तर इतका वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष आपण पूर्वी कधीही पाहिलेला नव्हता.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सरकारच्या चहापानावर बहिष्काराची पाच वर्षांची पत्रे विरोधकांनी तयार ठेवली आहेत. दरवेळी त्यातील एक काढतात. खरे तर इतका वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष आपण पूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेताना त्यांच्या पोटात मळमळ होत असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना जे करता आले नाही ते आम्ही तीन वर्षांत केले पाहिजे, या अपेक्षेतून ते टीका करीत आहेत. आम्ही चांगले करू शकू या त्यांच्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. अभ्यास न करता आरोप करणारे विरोधक हताश झाले आहेत. उद्यापासून सुरू होणाºया अधिवेशनात प्रत्येक बाबीवर सकारात्मक उत्तर देण्याची आमची तयारी आहे.शिवजयंतीला राज्य सरकारने शिवरायांना अभिवादन करणारी जाहिरात दिली नाही. कारण महापुरुषांबाबत शासनाने कधी जाहिराती द्यायच्या याचे एक धोरण आहे. त्यानुसारच त्या दिल्या जातात. हे धोरण अनिल देशमुख आणि त्यापूर्वी श्रीकांत जिचकार हे मंत्री असताना तेव्हाच्या सरकारांनी आखलेले होते आणि त्याची अंमलबजावणी तेव्हाच्या आणि आताच्याही सरकारने केलेली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मंत्रालयात झालेल्या आत्महत्यांसंदर्भात राज्य सरकारने गांभीर्याने कार्यवाही केलेली आहे. त्यातील एक धर्मा पाटील यांना योग्य मोबदला देण्यासंदर्भात न्याय देण्याचीच भूमिका घेतली आहे. मात्र अशा घटनांचे राजकारण न करण्याचे भानही विरोधकांना नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पारदर्शकच आहे, असे सांगून त्यांनी आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीची आकडेवारी सादर केली. बोंडअळीपासून गारपिटीपर्यंत सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई निश्चितपणे शेतकºयांना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.त्यांचा अभ्यास कमी-समृद्धी महामार्गाची जबाबदारी सांभाळत असलेले आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना निवृत्तीनंतर एमएसआरडीसीच्या सेवेत पुन्हा घेता यावे म्हणून जीआर काढल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांचा अभ्यास कमी पडतो. निवृत्त अधिकाºयास पुन्हा सेवेत घेता येईल, असे एमएसआरडीसीच्या घटनेतच म्हटले आहे. या नियमानुसारच पूर्वी आर.सी. सिन्हा यांना निवृत्तीनंतर सेवेत घेण्यात आले होते.नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा झालेल्या नोटा अद्यापही बदलून मिळाल्या नसल्याची जिल्हा बँकांची तक्रार आहे आणि रिझर्व्ह बँकेने त्यास नकार दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, या नोटा कुठून आल्या त्याचा स्रोत नीट सांगितला असता तर ही पाळी बँकांवर आली नसती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस