शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

महाविकास आघाडीत बिघाडी?, अपक्ष आमदारांवर गद्दारीचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 17:58 IST

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रशांत भदाणे

जळगाव : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. संजय राऊतांच्या आरोपाला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आमदार देवेंद्र भुसार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदेंनी महाविकास आघाडीलाच मतदान केलंय, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटलांनी दिलीये.

राष्ट्रवादीकडूनआरोपांचंखंडनसंजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचं राष्ट्रवादी काँग्रेसने खंडन केलं आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीलाच मतदान केले आहे. या निवडणुकीत मी आमचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा काउंटिंग एजंट होतो. माझ्यासह सुनील तटकरे आणि संजय खोडके यांच्यावर, या तीनही आमदारांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं आहे किंवा नाही, याची खात्री केली आहे.” “तयामुळं त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी संशोधन झालं पाहिजे,” असा चिमटाही आमदार अनिल पाटलांनी संजय राऊत यांना काढलाय.

संजय राऊतांनी केले होते गंभीर आरोपराज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. आमच्या मित्र पक्षांनीच दगाबाजी केल्याचा आरोप करत राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावेही घेतली होती. “राज्यसभा निवडणुकीत ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला तो शब्द पाळला गेला नाही. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजय शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत,” असा दावा संजय राऊत यांनी केला. “काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती.

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस