शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवरुन 'नापास' शेरा हटणार; सरकारने काढलं परिपत्रक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 12:10 IST

या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारने कौशल्य सेतू कार्यक्रम योजना सुरु केली आहे.

मुंबई - दहावी आणि बारावीची परीक्षा तरुण-तरुणींच्या आयुष्याला वळण देणारा मोठा टप्पा असल्याने या परीक्षेत नापास झाल्यास भविष्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी मागील सरकारच्या काळात अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. सरकारने याबाबत परिपत्रक काढून यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करुन देण्याची तसेच या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण शेरा न देता कौशल्य विकासास पात्र असा शेरा देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिले आहेत. 

या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारने कौशल्य सेतू कार्यक्रम योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करुन स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करणे. प्रशिक्षण झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना रोजगार-स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे असा कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. 

या नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याकरिता संगणीकृत पोर्टलवर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: नोंदणी करणे आवश्यक असून या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र आणि अनुत्तीर्ण असलेली गुणपत्रिका जोडणे गरजेचे आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची वर्गातील किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यास संबंधित उमेदवारास मूल्यमापन करण्याकरिता पात्र ठरविले जाणार आहे. 

दरम्यान, दहावीमध्ये अवघड वाटणाऱ्या विषयांशिवाय यापुढे परीक्षा देता येणार आहे. गणित, विज्ञान, इंग्रजीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते. या विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या या विषयांशिवाय आता परीक्षा देता येणार आहे. जानेवारी २०२० पासून मुक्त विद्यालयाचे दहावीचे वर्ग सुरु होणार आहेत. आठवी उत्तीर्ण किंवा वयाची पंधरा वर्षे पूर्ण असणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला दहावीचा प्रवेश मिळणार आहे. मुक्त विद्यालयाचा अभ्यासक्रम दहावी बोर्डाप्रमाणेच असणार आहे. दोन भाषा विषयांसह कोणतेही तीन अशा एकूण पाच विषयांची निवड विद्यार्थ्यांना करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण २१ व राष्ट्रीय कौशल्य विकास अभ्यासक्रमातील एकूण १४ विषयांमधून हे विषय निवडता येणार आहेत. नोंदणी केल्यानंतर पाच वर्षापर्यंत परीक्षा देण्याची सवलत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सोयीनुसार कोणत्याही एका विषयाची परीक्षा देता येणार आहे.

असं असेल मुक्त विद्यालयमुक्त विद्यापीठाप्रमाणेच मुक्त विद्यालयाची केंद्र नियुक्त केली जातील. या केंद्रात प्रवेश घेणाऱ्यांना शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. या केंद्रांवर त्या मुलांना त्यांनी निवडलेल्या विषयानुसार शिकवण्या दिल्या जातील. ही केंद्रे सरकारमान्य असल्यामुळे तेथून दहावी उत्तीर्ण होणाऱ्यांनाही नियमित शाळेच्या प्रमाणपत्राच्या दर्जासारखेच प्रमाणपत्र मिळेल.  

टॅग्स :Studentविद्यार्थीResult Dayपरिणाम दिवसMaharashtraमहाराष्ट्र