शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कारखान्यांची धुराडी २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 20:55 IST

३३ कारखाने राहणार बंद

ठळक मुद्देगेल्यावर्षीपेक्षा निम्मा ऊस गाळपासाठी उपलब्ध१६२ कारखान्यांनी केले अर्जसाखर संकुल देखभाल खर्च २५ पैसे

पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पूर आणि गेल्या वषीर्ची दुष्काळी स्थिती या मुळे यंदा गेल्यावर्षी पेक्षा निम्मा ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असल्याने जवळपास ३३ कारखाने बंद राहतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.  ऊस गाळप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक झाली. पाऊस लांबल्याने यंदाचा साखर हंगाम दीड महिना लांबला आहे. उत्तरभारतातील कारखाने या पुर्वीच सुरु झाले आहेत. गेल्यावर्षी परतीचा पाऊस न झाल्याने ऊस क्षेत्र घटले होते. त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. या सर्व कारणांमुळे गत हंगामाच्या तुलनेत ऊस क्षेत्र ११.६२ लाख हेक्टरवरुन ८.२२ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. गेल्यावर्षी १९५ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. तर, ९५२ लाख हेक्टर ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी कोरडा आणि यंदाच्या ओल्या दुष्काळामुळे ५१८ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. तसेच, साखरेचे उत्पादन देखील ५८ लाख टनांच्या आसपास राहिल. ------------------१६२ कारखान्यांनी केले अर्ज

आगामी गाळप हंगामासाठी १६२ कारखान्यांनी अर्ज केले असून, त्यातील १०५ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. गत हंगामाच्या तुलनेत यंदा ३३ कारखान्यांनी अर्जच केलेले नाही. अर्ज केलेल्या ५७ कारखान्यांपैकी १५ कारखान्यांच्या अर्जावर २२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर, उर्वरीत कारखान्यांकडे उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी काही ना काही रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम भरल्याशिवाय त्यांना परवाने दिले जाणार नाहीत, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ------------------------साखर संकुल देखभाल खर्च २५ पैसे

साखर संकुल इमारतीच्या देखभालीपोटी फारसा खर्च येत नसल्याने साखर कारखान्यांकडून देखभाल निधीपोटी घेण्यात येणारे प्रतिटन पन्नास पैसे कमी करावेत अशी मागणी कारखान्यांनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून, या पुढे कारखान्यांना देखभालीपोटी २५ पैसे प्रतिटन द्यावे लागतील.    ---------------------हप्त्यातील एफआरपीचा निर्णय नाहीशुगर केन कंट्रोल आॅर्डरनुसार एखाद्या साखर कारखान्याने ऊस उत्पादकांशी करार केला नसल्यास संबंधित शेतकºयाला ऊस कारखान्यात आल्यापासून १४ दिवसांत उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम द्यावी लागते. प्रत्येक शेतकºयाशी करार केल्यास ७५ टक्के रक्कम सुरुवातीस आणि उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीला समान हप्त्यात देता येते. मात्र, असा करार केल्याची माहिती कारखान्यांनी अजून आयुक्तालयाला दिलेली नसल्याची माहिती साखर आयुक्तालयाने दिली.  

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार