शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांची धुराडी २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 20:55 IST

३३ कारखाने राहणार बंद

ठळक मुद्देगेल्यावर्षीपेक्षा निम्मा ऊस गाळपासाठी उपलब्ध१६२ कारखान्यांनी केले अर्जसाखर संकुल देखभाल खर्च २५ पैसे

पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पूर आणि गेल्या वषीर्ची दुष्काळी स्थिती या मुळे यंदा गेल्यावर्षी पेक्षा निम्मा ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असल्याने जवळपास ३३ कारखाने बंद राहतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.  ऊस गाळप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक झाली. पाऊस लांबल्याने यंदाचा साखर हंगाम दीड महिना लांबला आहे. उत्तरभारतातील कारखाने या पुर्वीच सुरु झाले आहेत. गेल्यावर्षी परतीचा पाऊस न झाल्याने ऊस क्षेत्र घटले होते. त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. या सर्व कारणांमुळे गत हंगामाच्या तुलनेत ऊस क्षेत्र ११.६२ लाख हेक्टरवरुन ८.२२ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. गेल्यावर्षी १९५ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. तर, ९५२ लाख हेक्टर ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी कोरडा आणि यंदाच्या ओल्या दुष्काळामुळे ५१८ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. तसेच, साखरेचे उत्पादन देखील ५८ लाख टनांच्या आसपास राहिल. ------------------१६२ कारखान्यांनी केले अर्ज

आगामी गाळप हंगामासाठी १६२ कारखान्यांनी अर्ज केले असून, त्यातील १०५ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. गत हंगामाच्या तुलनेत यंदा ३३ कारखान्यांनी अर्जच केलेले नाही. अर्ज केलेल्या ५७ कारखान्यांपैकी १५ कारखान्यांच्या अर्जावर २२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर, उर्वरीत कारखान्यांकडे उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी काही ना काही रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम भरल्याशिवाय त्यांना परवाने दिले जाणार नाहीत, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ------------------------साखर संकुल देखभाल खर्च २५ पैसे

साखर संकुल इमारतीच्या देखभालीपोटी फारसा खर्च येत नसल्याने साखर कारखान्यांकडून देखभाल निधीपोटी घेण्यात येणारे प्रतिटन पन्नास पैसे कमी करावेत अशी मागणी कारखान्यांनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून, या पुढे कारखान्यांना देखभालीपोटी २५ पैसे प्रतिटन द्यावे लागतील.    ---------------------हप्त्यातील एफआरपीचा निर्णय नाहीशुगर केन कंट्रोल आॅर्डरनुसार एखाद्या साखर कारखान्याने ऊस उत्पादकांशी करार केला नसल्यास संबंधित शेतकºयाला ऊस कारखान्यात आल्यापासून १४ दिवसांत उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम द्यावी लागते. प्रत्येक शेतकºयाशी करार केल्यास ७५ टक्के रक्कम सुरुवातीस आणि उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीला समान हप्त्यात देता येते. मात्र, असा करार केल्याची माहिती कारखान्यांनी अजून आयुक्तालयाला दिलेली नसल्याची माहिती साखर आयुक्तालयाने दिली.  

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार