शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नागपूर, बोरिवली, पुणे रेल्वे स्थानकांत मिळणार विमानतळासारख्या सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 02:12 IST

आगामी काळात नागपूर, पुणे, औरंगाबाद, बोरिवली आदी निवडक रेल्वे स्थानके विमानतळांप्रमाणे होणार आहेत. प्रवाशांना येण्याजाण्यासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे नसतील.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : आगामी काळात नागपूर, पुणे, औरंगाबाद, बोरिवली आदी निवडक रेल्वे स्थानके विमानतळांप्रमाणे होणार आहेत. प्रवाशांना येण्याजाण्यासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे नसतील. सामानाच्या तपासणीसाठी प्रवाशांना रेल्वेगाडी यायच्या सुमारे तासभर आधी स्थानकावर यावे लागेल.रेल्वे स्थानकांत आग लागल्यास ते चार मिनिटांपेक्षा कमी वेळात रिकामे करण्यात येईल. इंडियन रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आयआरएसडीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. के. लोहिया यांनी सांगितले की, नागपूर रेल्वे स्थानकाचे विमानतळाप्रमाणे रुपडे पालटण्याचे काम येत्या पाच ते सहा महिन्यांत सुरू करण्याचा इरादा आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणुक एक महिन्यात करण्यात येईल. रेल्वे स्थानकांतील अशा बदलांसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातून निवडण्यात आलेल्या आराखड्यानुसार नागपूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे.देशातील रेल्वे स्थानकांमध्ये विमानतळाप्रमाणे बदल करण्यात येतील त्या कामाला ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल्वेच्या मूळ कार्याव्यतिरिक्त जी अन्य कामे आहेत ती खाजगी कंपन्यांकडून करून घेतली जातील. त्यात सफाई, जाहिरात, दुकाने चालविणे, प्रसाधनगृहांची निगा, पार्किंग या कामांचा समावेश आहे. रेल्वेगाड्या चालविणे, सुरक्षा ही कामे रेल्वेकडूनच पार पाडली जातील. रेल्वे स्थानकांचे अशा प्रकारे रुपडे पालटण्याचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अंधेरी, दादर, लोणावळा स्थानकांचाही समावेशअंधेरी, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल, लोणावळा, दादर, वर्धा, पुण्यानजिकचे शिवाजीनगर, अबू रोड आदी ४३ रेल्वे स्थानकांनाही विमानतळाप्रमाणे रुपडे व सोयी बहाल करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वे