शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

आमने-सामने : ईडीच्या कारवाया आता थांबणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 07:55 IST

सूडभावनेने ईडीची कारवाई केली जाते. ईडीच्या कारवाया आता थांबणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

ईडीच्या कारवाया आता थांबतील का, या प्रश्नाचा गर्भित अर्थ असा आहे की, भाजपने विरोधकांना नामोहरम करून त्यांचे राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर केला पण आता त्याची गरज उरली का? राज्यात गेल्या काही वर्षांत ईडीने कारवाया केल्या. त्यातील एक कारवाई अनिल देशमुख यांच्या विरोधातील आहे. देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआयने करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. सीबीआयने गुन्हा दाखल केला.

काळ्या पैशाचा अँगल असल्याने तपासात ईडीचा प्रवेश झाला. नवाब मलिक यांच्या बाबतीत एनआयएने गुन्हा दाखल केल्यानंतर काळ्या पैशांचा अँगल दिसल्याने ईडीने तपास केला. तशीच परिस्थिती अनिल परब यांची आहे.   ईडी तपास करत आहे, न्यायालयात जात आहे. अंतिम निर्णय न्यायालय देईल. आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा पण नेमके हेच होत नाही. भाजपचे विरोधक आहोत तर आपल्याला काळा पैसा माफ आहे, असा विरोधकांचा भाव आहे.

त्यामुळे ईडी या स्वायत्त संस्थेने कारवाई केली तरी त्याला राजकीय रंग देतात. आर्थिक गैरव्यवहार असले तरच ईडीची कारवाई होते. कर नाही त्याला डर कशाला? कष्टाने पैसे कमावणाऱ्या सामान्य माणसाला कधी ईडीच्या कारवाईचे भय वाटत नाही. जोपर्यंत काळ्या पैशांचे गुन्हे असतील, तोपर्यंत ईडीची कारवाई चालूच राहील. त्याचा सत्तांतराशी संबंध नाही. केशव उपाध्ये,प्रदेश मुख्य प्रवक्ते, भाजप 

गेल्या दोन वर्षात भाजपने राजकीयदृष्ट्या ज्यांना-ज्यांना टार्गेट केले होते, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली. केंद्र सरकारकडून प्रथमच अशा पद्धतीने राज्यात ईडीचा गैरवापर करण्याचा प्रकार घडला. आपल्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय वैमनस्य काढायचा चुकीचा पायंडा भाजपने पाडला आहे. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी ज्यांची-ज्यांची नावे घेतली त्यांच्यामागे ईडीने चौकशीचे शुक्लकाष्ट लावले. अगदी ठरवून, आदेश दिल्याप्रमाणे चौकशी करण्यात आली. 

आता ज्यांची नावे घेतली गेली ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपमध्ये गेले. आता त्यांच्यावर कारवाई होणार का, हा खरा प्रश्न आहे. की भाजपच्याविरोधात असाल तर कारवाई आणि भाजपसोबत असाल तर कारवाई नाही, असेच होणार असेल तर ते न्याय्य आहे का, याचा विचार जनताही करत आहे. 

भाजपमध्ये गेलेल्यांवर यापुढेही झाली कारवाई तरच ईडीने निष्पक्षपणे कारवाई केली, असे म्हणता येईल. पण तसे होणार आहे का? नाहीतरी हे ईडीचे सरकार आहे, असे जनताच बोलत आहे. ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र अशा मिम्स व्हायरल झाल्या आहेत. आता राज्यातही भाजप सत्तेवर आल्याने ईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टीच मिळेल, असे दिसतेय. हर्षल प्रधान,जनसंपर्क प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv Senaशिवसेना