शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

देशातून ७० लाख टन साखर निर्यात करणार : केंद्राचे धोरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:19 IST

देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे.

ठळक मुद्देशिल्लक साखरेवर काढणार मार्ग देशातील साखरेचा वार्षिक खप अडीचशे लाख टनांच्या आसपास ६० ते ७० लाख टन साखर देशातून निर्यात होणे गरजेचे उपायोजना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येणार

पुणे : सलग दुसऱ्या वर्षी देशात विक्रमी देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशातून ६० ते ७० लाख टन साखरेची निर्यात होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील साखर कारखान्यांना निर्यात कोटा दिला जाणार असून, त्यासाठी विशेष सवलत देखील देण्यात येणार असल्याची माहिती साखर महासंघाने दिली. यंदाच्या गाळप हंगामात ३३० लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातही असेच उत्पादन झाले होते. देशातील साखरेचा वार्षिक खप अडीचशे लाख टनांच्या आसपास आहे. गतहंगाम आणि यंदाचा शिल्लकी साठाधरुन यंदा १ ऑक्टोबर २०१९ ला सुरु होणाऱ्या हंगामाच्या  सुरुवातीला १४५ लाख टनांचा साठा शिल्लकी असेल. त्यामुळे ६० ते ७० लाख टन साखर देशातून निर्यात होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब निदर्शानास आणून दिली. त्याची दाखल घेवून अन्न मंत्रालयाने सह सचिवांच्या (साखर) अध्यक्षतेखाली १० जुलै रोजी बैठक आयोजित केली. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या या बैठकीत हंगाम २०१९-२० साठीच्या साखर निर्यातीचे धोरण व निर्यात योजनेवर चर्चा झाली. लवकरच २०१९-२० साठीची साखर निर्यात योजना करण्याचा निर्णय घेतला. त्यात ६० ते ७० लाख टन कच्ची व पांढरी साखर निर्यात करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी कारखाना अथवा राज्य निहाय साखर कोटा निश्चित करण्यात येईल, निर्यात दर व स्थानिक दर यातील तफावत दूर करण्यासाठी वित्तीय मदत देण्यात येईल. तसेच बँक स्तरावर निर्माण होणारा अपुरा दुरावा आणि त्यावर वेळीच उपायोजना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येईल. --निर्यातीला वातावरण अनुकुल

केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने काही आयातदार देशांना भेट दिली. यंदाच्या वर्षी जगातील दोन क्रमांकाचा व वार्षिक ४५ लाख टन साखर आयात करणाऱ्या इंडोनेशियाने भारतीय साखरेच्या आयात करात १५ टक्क्याहून ५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. भारतातून तयार होणाºया कच्च्या साखरेची खरेदी करण्याचे मान्य केली आहे. तसेच थायलंड, पाकिस्तान, ब्राझील, युरोपात साखर निर्मिती कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे  जागतिक पातळीवर दोन वर्षानंतर प्रथमच साखरेचा तुटवडा जाणवेल. भारतातून निर्यात होणाऱ्या कच्च्या व पांढऱ्या साखरेची चांगली मागणी राहील. त्यासाठी साखर कारखान्यांनी नियोजनबद्धपणे पूर्वतयारीला लागावे असे, प्रकाश नाईकनवरे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरी