शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

देशातून ७० लाख टन साखर निर्यात करणार : केंद्राचे धोरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:19 IST

देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे.

ठळक मुद्देशिल्लक साखरेवर काढणार मार्ग देशातील साखरेचा वार्षिक खप अडीचशे लाख टनांच्या आसपास ६० ते ७० लाख टन साखर देशातून निर्यात होणे गरजेचे उपायोजना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येणार

पुणे : सलग दुसऱ्या वर्षी देशात विक्रमी देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशातून ६० ते ७० लाख टन साखरेची निर्यात होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील साखर कारखान्यांना निर्यात कोटा दिला जाणार असून, त्यासाठी विशेष सवलत देखील देण्यात येणार असल्याची माहिती साखर महासंघाने दिली. यंदाच्या गाळप हंगामात ३३० लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातही असेच उत्पादन झाले होते. देशातील साखरेचा वार्षिक खप अडीचशे लाख टनांच्या आसपास आहे. गतहंगाम आणि यंदाचा शिल्लकी साठाधरुन यंदा १ ऑक्टोबर २०१९ ला सुरु होणाऱ्या हंगामाच्या  सुरुवातीला १४५ लाख टनांचा साठा शिल्लकी असेल. त्यामुळे ६० ते ७० लाख टन साखर देशातून निर्यात होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब निदर्शानास आणून दिली. त्याची दाखल घेवून अन्न मंत्रालयाने सह सचिवांच्या (साखर) अध्यक्षतेखाली १० जुलै रोजी बैठक आयोजित केली. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या या बैठकीत हंगाम २०१९-२० साठीच्या साखर निर्यातीचे धोरण व निर्यात योजनेवर चर्चा झाली. लवकरच २०१९-२० साठीची साखर निर्यात योजना करण्याचा निर्णय घेतला. त्यात ६० ते ७० लाख टन कच्ची व पांढरी साखर निर्यात करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी कारखाना अथवा राज्य निहाय साखर कोटा निश्चित करण्यात येईल, निर्यात दर व स्थानिक दर यातील तफावत दूर करण्यासाठी वित्तीय मदत देण्यात येईल. तसेच बँक स्तरावर निर्माण होणारा अपुरा दुरावा आणि त्यावर वेळीच उपायोजना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येईल. --निर्यातीला वातावरण अनुकुल

केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने काही आयातदार देशांना भेट दिली. यंदाच्या वर्षी जगातील दोन क्रमांकाचा व वार्षिक ४५ लाख टन साखर आयात करणाऱ्या इंडोनेशियाने भारतीय साखरेच्या आयात करात १५ टक्क्याहून ५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. भारतातून तयार होणाºया कच्च्या साखरेची खरेदी करण्याचे मान्य केली आहे. तसेच थायलंड, पाकिस्तान, ब्राझील, युरोपात साखर निर्मिती कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे  जागतिक पातळीवर दोन वर्षानंतर प्रथमच साखरेचा तुटवडा जाणवेल. भारतातून निर्यात होणाऱ्या कच्च्या व पांढऱ्या साखरेची चांगली मागणी राहील. त्यासाठी साखर कारखान्यांनी नियोजनबद्धपणे पूर्वतयारीला लागावे असे, प्रकाश नाईकनवरे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरी