शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत शेतातल्या फळभाज्या थेट ग्राहकांच्या घरी; प्रयोगशील शेतकऱ्यांनी उघडली 'ऑनलाईन मंडई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 13:53 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांशी नातं जोडलं आहे.

ठळक मुद्देअहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' उपक्रम सुरु केलाशेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.   सर्वसामान्यांसह सेलेब्रिटीही करतायेत ऑनलाईन भाजीखरेदी

देशात सध्या कोरोनाचं संकट समोर आहे, अशातच गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे, या संघर्षाच्या काळात अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी एका अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतातील ताजी फळे, भाज्या पोहचवण्याचं काम हाती घेतलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसह अनेक सेलेब्रिटींनीही घरबसल्या भाजीपाला मागवला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांशी नातं जोडलं आहे. श्रीरामपूरमधील आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या शेतातून मुंबई- पुण्याच्या व अन्य शहरांतून जमलेल्या शेकडो ग्राहकांना भाजीपाला पोहचवण्याचं काम सुरु केले आहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' ह्या ऑनलाईन मंडईची स्थापना केली आहे.

लॉकडाऊन काळात अनेक फळभाजी पुरवठादार व विक्रेते, उद्यमशील व्यक्ती व नवउद्योगांनीही ऑनलाईन व घरपोच भाजीपाला व फळे विक्रीचा उद्योग सुरु केला आहे. घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या लोकांसाठी ही सोय असली तरीही याप्रकारच्या भाजीपाला व फळे पुरवठ्यात काही त्रुटी आहेत. यातील अनेकजण शेतकऱ्यांकडून घाऊक खरेदी करून, भाजीपाला व फळांचा साठा करून मागणीप्रमाणे पुरवठा करीत आहेत. यात ग्राहकांना आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असलेला ताजा, पोषणमूल्ये टिकून असलेला व स्वच्छ भाजीपाला मिळत नसल्याने ग्राहक वंचित राहिले आहेत. यादृष्टीने, ग्राहकांना ताजा शेतमाल कसा असतो व कमीतकमी वेळेत थेट शेतातून तो दारी कसा पोहोचू शकतो, हे या कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.                 

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' या 'शेतकरी उत्पादक कंपनी'ची अलिकडेच स्थापना केली असून कमीतकमी वेळेत ताजा शेतमाल घरपोच  पोहोचविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन असा प्रगतीशील व तंत्रज्ञानावर आधारित मंच उभा करण्याचा अहमदनगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नाला मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या शहरांतून शेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.         

या उपक्रमामध्ये अनेक तरूण, सुशिक्षित, प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी एकत्र आले असून, त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करीत भाजीपाला व फळांचे वितरण करण्याची व्यवस्था केली आहे. यात आधुनिक मशागत, पीक काढणी प्रक्रियेबरोबर मालाचे वर्गीकरण, बास्केट पॅकिंग व ग्राहक केंद्राच्या मदतीने विनाविलंब २४ तासात ग्राहकांच्या दारी भाजीपाला पोहोचविण्यासाठी शेतकरी भर देत आहेत. गेल्या तीन महिन्यांत 'किसान कनेक्ट'ने सुमारे ८० हजार फळभाज्यांच्या बास्केटस् मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी वितरित केल्या आहेत. फळभाज्या ताज्या, शुद्ध व स्वच्छ राहून त्यांची हाताळणी होऊ नये यासाठी प्रथमच 'किसान कनेक्ट' खास बनविलेल्या बास्केटसमधून ग्राहकांना पुरवठा करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी