शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

२४ तासांत शेतातल्या फळभाज्या थेट ग्राहकांच्या घरी; प्रयोगशील शेतकऱ्यांनी उघडली 'ऑनलाईन मंडई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 13:53 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांशी नातं जोडलं आहे.

ठळक मुद्देअहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' उपक्रम सुरु केलाशेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.   सर्वसामान्यांसह सेलेब्रिटीही करतायेत ऑनलाईन भाजीखरेदी

देशात सध्या कोरोनाचं संकट समोर आहे, अशातच गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे, या संघर्षाच्या काळात अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी एका अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतातील ताजी फळे, भाज्या पोहचवण्याचं काम हाती घेतलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसह अनेक सेलेब्रिटींनीही घरबसल्या भाजीपाला मागवला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांशी नातं जोडलं आहे. श्रीरामपूरमधील आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या शेतातून मुंबई- पुण्याच्या व अन्य शहरांतून जमलेल्या शेकडो ग्राहकांना भाजीपाला पोहचवण्याचं काम सुरु केले आहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' ह्या ऑनलाईन मंडईची स्थापना केली आहे.

लॉकडाऊन काळात अनेक फळभाजी पुरवठादार व विक्रेते, उद्यमशील व्यक्ती व नवउद्योगांनीही ऑनलाईन व घरपोच भाजीपाला व फळे विक्रीचा उद्योग सुरु केला आहे. घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या लोकांसाठी ही सोय असली तरीही याप्रकारच्या भाजीपाला व फळे पुरवठ्यात काही त्रुटी आहेत. यातील अनेकजण शेतकऱ्यांकडून घाऊक खरेदी करून, भाजीपाला व फळांचा साठा करून मागणीप्रमाणे पुरवठा करीत आहेत. यात ग्राहकांना आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असलेला ताजा, पोषणमूल्ये टिकून असलेला व स्वच्छ भाजीपाला मिळत नसल्याने ग्राहक वंचित राहिले आहेत. यादृष्टीने, ग्राहकांना ताजा शेतमाल कसा असतो व कमीतकमी वेळेत थेट शेतातून तो दारी कसा पोहोचू शकतो, हे या कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.                 

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' या 'शेतकरी उत्पादक कंपनी'ची अलिकडेच स्थापना केली असून कमीतकमी वेळेत ताजा शेतमाल घरपोच  पोहोचविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन असा प्रगतीशील व तंत्रज्ञानावर आधारित मंच उभा करण्याचा अहमदनगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नाला मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या शहरांतून शेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.         

या उपक्रमामध्ये अनेक तरूण, सुशिक्षित, प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी एकत्र आले असून, त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करीत भाजीपाला व फळांचे वितरण करण्याची व्यवस्था केली आहे. यात आधुनिक मशागत, पीक काढणी प्रक्रियेबरोबर मालाचे वर्गीकरण, बास्केट पॅकिंग व ग्राहक केंद्राच्या मदतीने विनाविलंब २४ तासात ग्राहकांच्या दारी भाजीपाला पोहोचविण्यासाठी शेतकरी भर देत आहेत. गेल्या तीन महिन्यांत 'किसान कनेक्ट'ने सुमारे ८० हजार फळभाज्यांच्या बास्केटस् मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी वितरित केल्या आहेत. फळभाज्या ताज्या, शुद्ध व स्वच्छ राहून त्यांची हाताळणी होऊ नये यासाठी प्रथमच 'किसान कनेक्ट' खास बनविलेल्या बास्केटसमधून ग्राहकांना पुरवठा करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी