शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

By यदू जोशी | Updated: August 17, 2025 06:18 IST

राज्यात तब्बल अडीच हजार कोटींची अजूनही थकबाकी

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाहतुकीचे नियम मोडले म्हणून एकट्या मुंबईत विविध वाहनांवरील दंडाची रक्कम एक हजार कोटी रुपयांच्या घरात तर राज्यात अडीच हजार कोटी रुपयांच्या घरात गेलेली असताना आता वाहनधारकांसाठी एकरकमी परतफेडीची अभय योजना आणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

असा निर्णय झाला तर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांच्या मालकांना या निर्णयाने दिलासा मिळणार असून राज्याच्या तिजोरीत एकमुस्त रक्कम जमा होऊ शकेल. मुंबईत २०२० पासूनची या दंडाची (ह-चालान) थकबाकीची रक्कम ही १,८१७ कोटी रुपये इतकी होती. त्यातील ८१७ कोटी रुपये वसूल करण्यात आले तरीही एक हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. दंडाची रक्कम कितीही वाढली तरी तो न भरण्याचीच वाहन मालकांची प्रवृत्ती असते.

दंडाची रक्कम कमी करायची तर लोकअदालत हा एक मार्ग आहे. लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम जठलपास निम्मी करून दिलासा दिला जातो, असा अनुभव आहे. तरीही लोकअदालतीला अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळत नाही. या पार्श्वभूमीवर एकरकमी परतफेडीचा पर्याय आता समोर आला आहे.

रिक्षा, दुचाकीला ७५% दंड होणार माफ?

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी परिवहन सचिवांकडे प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ओटीएस देताना १००% दंड वसूल करण्याऐवजी मोठी सूट दिली जाईल. ऑटोरिक्षा व दुचाकी वाहनधारकांनी २५ % रक्कम भरावी म्हणजे त्यांना ७५% दंड माफ केला जाईल, असाही प्रस्ताव आहे.

यापुढील काळात दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आत वाहनधारक भरणार असतील तर त्यांना ५० टक्के दंड माफ करावा, असेही प्रस्तावित आहे. वाहनमालक जर दंडाची रक्कम भरणार नसतील तर ओटीएस देऊन किमान ५० ते ७५ टक्के रक्कम तरी वसूल करता येऊ शकेल, अशी कल्पना आता समोर आली आहे.

दुचाकी, तीनचाकी वाहने आणि स्वस्त कारसाठी अभय योजनेत दंडाची रक्कम ही महागड्या गाड्यांच्या तुलनेत कमी आकारली जाईल. लाखो वाहनांवर आज अडीच हजार कोटींहून अधिकचा दंड आहे. अभय योजनेद्वारे तो कमी करावा, त्याचवेळी सरकारला दंड आकारणीद्वारे एकाच वेळी मोठी रक्कम मिळेल, हाही त्यामागील उद्देश आहे.

एसओपी तयार करणार

वाहतुकीचा कोणता नियम मोडला तर किती दंड आकारावा हे परिवहन विभागाने निश्चित केलेले आहे. मात्र, अंमलबजावणीचे काम वाहतूक पोलिसांना दिले जाते. दंडाबाबत वाहतूक पोलिसांची मनमानी, नसलेले अधिकार वापरून वाहनचालकांना ते देत असलेला त्रास यातून संघर्ष होतो. यामुळे वाहतूक पोलिसांच्या अधिकारांत स्पष्टता यावी यासाठी एसओपी तयार करण्याचेही प्रस्तावित आहे, असे सूत्रांनी सांगितले.

वाहतुकीचे नियम तोडल्याने आकारण्यात आलेला दंड हा सरसकट रह केला जाणार नाही, पण काही टक्के आकारणी करून इतर दंड माफ करावा, असे प्रस्तावित आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रpratap sarnaikप्रताप सरनाईक