शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अनिल देसाई, वर्षा गायकवाड दोघांमध्ये देवाणघेवाण; ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेसचे तर गायकवाडांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे काम करणार 

By अतुल कुलकर्णी | Updated: May 5, 2024 08:08 IST

मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांना हवा होता. ही देवाणघेवाण किती यशस्वी ठरते यावरही या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

- अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर मध्य या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे सेनेचे अनिल देसाई आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दोघांमध्ये ‘इस हात लो उस हात दो’ असे नियोजन केले गेल्याची चर्चा आहे. ही देवाणघेवाण किती यशस्वी ठरते यावरही या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांना हवा होता. या मतदारसंघातून त्यांचे वडील एकनाथ गायकवाड २००४ आणि २००९ या दोन लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये येथून तेव्हाच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून आले. आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे उभे आहेत. या मतदारसंघात धारावीचा मोठा भाग येतो. वर्षा गायकवाड धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आपले वडील ज्या ठिकाणी पराभूत झाले त्याच मतदारसंघातून आपल्याला निवडून घ्यायचे आहे अशी त्यांची भावना होती. तर शिवसेना भवन या मतदारसंघात येते त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला हवा अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. 

धारावी पुनर्विकासाचा विषय गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. हे काम अदानी समूहाला मिळालेले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मुख्यालय या मतदारसंघात आहे किंवा उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मुंबई उत्तरमध्ये आहे, या गोष्टीपेक्षाही धारावी पुनर्वसनाचा विषय दोन्ही उमेदवारांसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळेच या मतदारसंघासाठी दोन्ही बाजूने हट्ट सुरू होता असे सांगितले जाते. पण शेवटी अनिल देसाई यांनाच मुंबई दक्षिण मध्यमधून उमेदवारी जाहीर झाली. 

मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उज्वल निकम आहेत. एमआयएमचे रमजान चौधरी यांनीही याच मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघात ४,२७,१०० एवढे मुस्लिम मतदार आहेत. 

एमआयएमची उमेदवारी भाजप पुरस्कृत असल्याचे बोलले जात असले तरी, मुस्लिम मतदार यावेळी भाजपला मदत करणाऱ्यांसोबत जातील का? असा तर्क यासाठी दिला जात आहे. मुंबई उत्तर मध्य मध्ये  ५,६७,१०० इतके सर्व समाजाचे मराठी मतदार आहेत. त्यामुळे या मतांची विभागणी होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मतदान याच मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करेन. हाताचे बटण दाबेन, असे जाहीरपणे सांगितले होते. 

गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड या दोन मतदारसंघांसाठी नियोजन सुरू आहे. मुंबई उत्तर मध्य मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या शिवसैनिकांनी वर्षा गायकवाड यांचे काम करावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांची माणसे कामाला लावली आहेत. माजी मंत्री अनिल परबही वर्षा गायकवाड यांच्यासाठी काम करत आहेत. ठाकरे यांनी आपल्या विश्वासातील काही लोकांना वर्षा गायकवाड यांच्यासाठी कार्यालय स्थापन करण्यापासून अनेक गोष्टींची जबाबदारी सोपवली आहे. ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांच्यासाठी कलिनामधून संजय पोतनीस यांना कामाला लावले आहे. ते तिथले आमदारही आहेत. याच पद्धतीने धारावीमधून उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी वर्षा गायकवाड यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. या दोघांमधील ही देवाणघेवाण व्यवस्थित पार पडली, तर मतांचे गणित सोपे जाईल असे दोन्ही बाजूंचे म्हणणे आहे.

 मुंबई दक्षिण मध्यमधील विद्यमान आमदार  नवाब मलिक, अणुशक्ती नगर (अजित पवार गट)   प्रकाश पातरपेकर, चेंबूर (उद्धवसेना)   वर्षा गायकवाड, धारावी (काँग्रेस)   कॅप्टन आर तमिल सेलवन, सायन कोळीवाडा (भाजप)  कालिदास कोळंबकर, वडाळा (भाजप)   सदा सरवणकर, माहीम (शिंदेसेना)

 मुंबई उत्तर मध्यमधील  विद्यमान आमदार  पराग अळवणी, विलेपार्ले (भाजप)  दिलीप लांडे, चांदीवली (शिंदेसेना)  मंगेश कुडाळकर, कुर्ला (शिंदेसेना)  संजय पोतनीस, कलीना (उद्धवसेना)  झिशान सिद्दिकी, बांद्रा, पूर्व (अजित पवार गट) आशिष शेलार, बांद्रा, प. (भाजप)

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडAnil Desaiअनिल देसाईmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४mumbai-south-central-pcमुंबई दक्षिण मध्यmumbai-north-central-pcमुंबई उत्तर मध्य