शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

दर साडेदहा मिनिटांना देशात एकास सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:13 AM

राज्यात सर्वाधिक प्रमाण; आरोग्य व्यवस्थापन प्रणालीचा अहवाल

मुंबई : देशात सर्वात जास्त सर्पदंशाच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर महिन्यांत राज्यात ३३ हजार ६७३ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. तर देशात १ लाख ६१ हजार ४७८ सर्पदंशाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात २०१४-१५ साली ३८ हजार ५१४, २०१५-१६ साली ३९ हजार १०३, २०१६-१७ साली ३६ हजार ६० सर्पदंशाच्या घटना घडल्या. देशात दर साडेदहा मिनिटाला एका व्यक्तीला सर्पदंश होतो, असे भारत सरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशीगंधा नाईक यांनी या संदर्भात सांगितले की, देशात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र, त्यावर तत्काळ उपचार न मिळाल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो. देशात एड्स आजाराने सर्वांत जास्त बळी जातात. त्यानंतर, सर्पदंश होऊन बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सरकार एड्सवर उपाययोजना, जागृती करते. मात्र, सर्पदंशाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती जास्त प्रमाणात होताना दिसून येत नाही. सर्पदंशाच्या घटनेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू