शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:08 IST

"एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना..."

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करत जीआर काढल्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण सोडले. यासंदर्भात आता शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. "यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते. म्हणजे, अगदी मी त्यांचा टीकारार असतो, तरी हे मी सांगू शकतो की, कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

यावेळी, काल जरांगे पाटलांची इच्छा होती की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्यांनी त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी व्यासपीठावर यावे, पण त्यावेळी ती मान्य झाली नाही, कारण प्रत्येक नेता वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले? असे एका पत्रकाराने विचारले असता, राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजधानितला हा अतिशय गंभीर प्रश्न होता. अशा वेळेला सर्वांनी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये राहणे आवश्यक होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. मुंबई संदर्भातील काही प्रश्न निर्माण झाले होते. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्र ठेवण्यासाठी, कधीही भडका उडू शकत होता. मुंबईतच थांबणे आवश्यक होते." 

राऊत पुढे म्हणाले, "स्वतः देवेंद्र फडणवीस या वाटाघाटीत गुंतलेले होते. हे मला माहीत आहे. की, कशा प्रकारे यातून मर्ग काढायचा? हाय कोर्टाच्या निर्णयानंतर आपण कशा प्रकारची पावले टाकायला हवीत? किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलांकडे जायला हवे? यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते. म्हणजे, अगदी मी त्यांचा टीकारार असतो, तरी हे मी सांगू शकतो की, कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. यासंदर्भात त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांबद्दल अपशब्द वापरले, त्यांनी हे लक्ष्यात घ्यायला हवे." 

याच वेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना, "एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता? की हे प्रकरण आणखी चिघळत रहावे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत यावेत, अशी काही योजना दुसरे लोक करत होते का? हे काल प्रकर्षाने जानवले, असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा