शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
2
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
4
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
5
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
6
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
7
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
8
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
9
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
10
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
11
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
12
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
13
ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
14
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट
15
चीनची 'पॉवर परेड'! अण्वस्त्रे, समुद्री ड्रोन आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे
16
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा
17
पुतिन-जिनपिंग अन् किम यांचं अमेरिकेविरोधात षडयंत्र; चीनमधील परेड पाहून डोनाल्ड ट्रम्प संतापले
18
फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर
19
"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा

"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:08 IST

"एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना..."

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करत जीआर काढल्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण सोडले. यासंदर्भात आता शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. "यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते. म्हणजे, अगदी मी त्यांचा टीकारार असतो, तरी हे मी सांगू शकतो की, कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

यावेळी, काल जरांगे पाटलांची इच्छा होती की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्यांनी त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी व्यासपीठावर यावे, पण त्यावेळी ती मान्य झाली नाही, कारण प्रत्येक नेता वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले? असे एका पत्रकाराने विचारले असता, राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजधानितला हा अतिशय गंभीर प्रश्न होता. अशा वेळेला सर्वांनी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये राहणे आवश्यक होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. मुंबई संदर्भातील काही प्रश्न निर्माण झाले होते. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्र ठेवण्यासाठी, कधीही भडका उडू शकत होता. मुंबईतच थांबणे आवश्यक होते." 

राऊत पुढे म्हणाले, "स्वतः देवेंद्र फडणवीस या वाटाघाटीत गुंतलेले होते. हे मला माहीत आहे. की, कशा प्रकारे यातून मर्ग काढायचा? हाय कोर्टाच्या निर्णयानंतर आपण कशा प्रकारची पावले टाकायला हवीत? किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलांकडे जायला हवे? यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते. म्हणजे, अगदी मी त्यांचा टीकारार असतो, तरी हे मी सांगू शकतो की, कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. यासंदर्भात त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांबद्दल अपशब्द वापरले, त्यांनी हे लक्ष्यात घ्यायला हवे." 

याच वेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना, "एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता? की हे प्रकरण आणखी चिघळत रहावे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत यावेत, अशी काही योजना दुसरे लोक करत होते का? हे काल प्रकर्षाने जानवले, असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा