शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:09 IST

दहावीत गणित आणि विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयाची परीक्षा आवश्यक गुणांसह उत्तीर्ण होण्याचे दडपण प्रत्येक विद्यार्थ्यांवर असते. पण आता हे दडपण दूर करण्यात आले असून या विषयांत उत्तीर्ण होण्यासाठीची गुणमर्यादा आता ३५ वरून २० करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

याबाबत राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तरतूद करण्यात आली असून राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने नुकतीच त्याला अंतिम मान्यता दिली आहे. मात्र यंदाच्या परीक्षेत त्यानुसार कोणताही बदल होणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

यानुसार दहावीत गणित आणि विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळणार आहेत. पहिल्या पर्यायानुसार नेहमीप्रमाणे पुन्हा परीक्षा देऊन या विषयांत उत्तीर्ण होता येईल. आणि दुसऱ्या पर्यायात विद्यार्थ्याला उत्तीर्ण म्हणून अकरावीला प्रवेश घेता येईल, मात्र पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारित अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही. त्याबाबत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरच शेरा देण्यात येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रHSC Exam Resultबारावी निकालssc examदहावी