शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

साहसी उपक्रमातील तज्ञमंडळींच्या पुढाकाराने ' महा अ‍ॅडव्हेंचर कौन्सिल 'ची स्थापना..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 15:02 IST

हिमालयातील अतिउंचीवर आयोजित केलेल्या एका पदभ्रमण मोहिमेतील दुर्दैवी घटनेमध्ये आपला मुलगा गमावलेल्या पालकांनी अशा दुर्घटना टाळाव्यात आणि कमी व्हाव्यात या हेतूने एक जनहित याचिका दाखल केली होती.

ठळक मुद्देदुर्दैवी घटना घडल्यानंतर ती ठिकाण बंद करणे हा त्यावरचा मार्ग नाही मॅकला खूप काही करायचे आहे पण सरकारी यंत्रणांचीही मदत लागणार

- नम्रता फडणीसपुणे : पावसाळा सुरू झाला की टेÑकसंर्ना वेध लागतात ते गडकिल्ल्यांचे. काही नवशे-गवशे देखील कोणतीही माहिती न घेता मनसोक्तपणे गडांवर भटकंती करायला जातात. कुणी उत्साहाच्या भरात सेल्फी काढायला जातो अन पाय घसरतो. हिमालयाच्या अतिउंचावरच्या मोहिमांमध्येही काही गियार्रोहकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना  समोर आल्या आहेत. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध साहसी उपक्रमात कार्यरत असलेल्या अनुभवी आणि तज्ञ व्यक्ती एकत्र आल्या असून, त्यांनी महाअ‍ॅॅडव्हेंचर कौन्सिल (मॅक) ची स्थापना केली आहे.प्रसिद्ध गियार्रोहक आणि लेखक वसंत वसंत लिमये हे या ह्यमहा अ‍ॅडव्हेंचर कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्वे तयार करणे, साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या, त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या तसेच विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या अशा सर्वांनाच आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध करणे व संबंधित सरकारी खात्यांशी संवाद साधणे अशा विविध पातळ्यांवर मॅक काम करणार आहे. यासंदर्भात वसंत लिमये म्हणाले, हिमालयातील अतिउंचीवर आयोजित केलेल्या एका पदभ्रमण मोहिमेतील दुर्दैवी घटनेमध्ये आपला मुलगा गमावलेल्या पालकांनी अशा दुर्घटना टाळाव्यात आणि कमी व्हाव्यात या हेतूने एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या परिणामस्वरूप शासनाने दोन वटहुकूम काढले. त्याला विरोध करण्याच्या निमित्ताने काही मंडळी एकत्र आली. आमचा सरकारच्या सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांना नव्हे तर त्या ज्या स्वरूपाच्या सूचना आहेत त्याला विरोध आहे. या वटहुकुमाविरोधात न्यायालयात आम्ही जनहित याचिका सादर केली आहे. पण नुसता विरोध करून उपयोग नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीतरी पावले उचलली गेली पाहिजेत  या दृष्टीकोनातून  महा अ‍ॅडव्हेंचर कौन्सिल (मॅक) च्या स्थापनेचा विचार पुढे आला. कौन्सिलच्या निर्मितीसाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. सध्या कौन्सिलच्या सदस्यत्वाची नोंदणी सुरू झाली आहे. गिरीमित्र संमेलनामध्ये मॅकसंदभार्तील घोषणा केली जाणार आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक, कोल्हापूर याठिकाणी जाऊन बैठका घेतल्या जाणार आहेत. खरंतर अनेकदा असे होते की एखादी गंभीर घटना घडली की बातम्या येतात. पण अशा घटनांचा सातत्याने अभ्यास करून त्या का घडतात? त्या घटनांची नोंद ठेवणे अशा प्रकारचे संशोधन करण्याची गरज आहे. पुढील टप्प्यात शासनाच्या मदतीने एखादे संकेतस्थळ सुरू करता येईल, याचाही विचार केला जाणारआहे. ज्यायोगे त्या संकेतस्थळावर नोंद झाल्यास कोण कुठल्या मोहिमेला गेला आहे याची माहिती मिळू शकेल. हरिहरेश्वर, राजमाची सारख्या ठिकाणांवर आज नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. घटना घडल्यानंतर ती ठिकाण बंद करणे  हा त्यावरचा मार्ग असू शकत नाही.  मॅकला खूप काही करायचे आहे पण सरकारी यंत्रणांचीही मदत लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

............

मॅकची उद्दिष्टे* सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून संशोधनावर आधारित नवीन सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्व विकसित करणे.* ही मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्षात उपयोगी आणण्यासाठी विविध संस्थांमध्ये ताळमेळ साधणे.* धोका व्यवस्थापनात सुसंवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.* या क्षेत्रातील विविध घडामोडी सर्वांपर्यंत पोहोचविणे.* आयोजक संस्था, सहभागी, त्यांचे कुटुंबीय आणि सरकार अशा विविध भागधारकांमध्ये सहचर्य वाढवणे आणि त्यांचा पाठिंबा मिळविणे.* साहसी क्रीडा प्रकारातील सुरक्षिततेसंदर्भात सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन करणे. * आयोजनातील सुरक्षेवर परिणाम करणा-या महत्वाच्या बाबींचे प्रशिक्षण देणे------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंगAccidentअपघात