शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘दे धक्का’

By admin | Updated: August 5, 2016 02:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा कारभार ‘आॅनलाईन’ झाल्यामुळे निकालांतील गोंधळ होणारच नाही, अशी अपेक्षा होती.

तांत्रिक चुकीचा फटका : गुणपत्रिकेत शेकडो विद्यार्थ्यांना दाखविले अनुपस्थित नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा कारभार ‘आॅनलाईन’ झाल्यामुळे निकालांतील गोंधळ होणारच नाही, अशी अपेक्षा होती. परंतु ‘आॅल इज वेल’ची अपेक्षा करणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जोरदार धक्का बसला आहे. परीक्षेला उपस्थित असूनदेखील अभियांत्रिकीच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. यामुळे ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’मध्ये निवड होऊनदेखील बरेच विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. अनेक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे उन्हाळी परीक्षेपासून ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन सुरू झाले व निकालांचा वेग वाढला. अभियांत्रिकीचे मूल्यांकनदेखील ‘आॅनस्क्रीन’ झाले. परंतु त्याचा वेग संथ होता. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा होती. परंतु दोन दिवसांपूर्वी निकाल जाहीर झाल्यावर शेकडो विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या गुणपत्रिकेत चक्क सोडविलेल्या पेपरमध्ये अनुपस्थित दाखवून त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले. मागील सत्रांमध्ये प्रावीण्य श्रेणीतील गुण मिळविलेले काही हुशार विद्यार्थीदेखील या गोंधळामुळे अनुत्तीर्ण झाले आहेत. यात काही विशिष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. यात नागपूर व शहराबाहेरील महाविद्यालयांचा समावेश आहे. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्यांनी लगेच महाविद्यालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांना विद्यापीठाकडे पाठविण्यात आले. संबंधित बाब विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या कानी पडल्यावर तेदेखील बुचकळ््यात पडले.(प्रतिनिधी) विद्यार्थी चिंतेत अंतिम वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक महाविद्यालयांत ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ आटोपले असते. विद्यार्थ्यांना पुढील परीक्षा उत्तीर्ण करायच्या असतात. परंतु पेपर चांगले गेले असतानादेखील त्यात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केल्यामुळे अनेक विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. हातातील लाखमोलाची नोकरी जाते की काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची तयारी केली होती. त्यांचादेखील या निकालामुळे भ्रमनिरास झाला आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील फटका दरम्यान, विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील विद्यापीठातील भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. ‘बीए एलएलबी’च्या पाच वर्षीय अभ्यासक्रमातील चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाला. यात इंग्रजी व फिलॉसॉफी या दोन पेपरमध्ये अनेक विद्यार्थ्यांना चक्क अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. विधी महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा भवनात गेले असताना त्यांना तेथे कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तर दिले नाही. एक तर निकाल वेळेवर लागले नाही आणि घाईगडबडीत उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन योग्य प्रकारे झाले नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत प्रतिक्रियेसाठी परीक्षा नियंत्रकांशी संपर्क होऊ शकला नाही. विद्यापीठाचे विद्यार्थ्यांवरच खापर यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांना विचारणा केली असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत असल्याचे मान्य केले. यात विद्यापीठाची काहीच चूक नाही. विद्यार्थ्यांनीच त्यांचा परीक्षा अर्ज योग्य पद्धतीने भरला नव्हता. अर्जात ‘इलेक्टिव्ह’ पेपर म्हणून एका विषयाचे नाव दिले आणि प्रत्यक्षात दुसराच पेपर दिला. महाविद्यालयांनीदेखील त्यांना मार्गदर्शन केले नाही व ऐनवेळी विद्यार्थ्यांची ही चूक सुधारण्याची पत्राद्वारे विनंती केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी झालेली चूक ‘मॅन्युअली’ बदलून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. गुणपत्रिकांमध्येदेखील त्रुटी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका संकेतस्थळावर आलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये त्रुटी आहेत. कुठे विद्यार्थ्यांचे नाव बदलण्यात आले आहे, तर कुठे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी असे दाखविण्यात आले आहे. काही गुणपत्रिकांवर परीक्षा नियंत्रकांची सहीच नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.