शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला धक्के पे धक्का! अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई; कारखान्याची २०० एकर जमीन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:23 IST

ईडीच्या कारवाईनंतर आता गुवाहाटीला जाणार का, यावर अर्जुन खोतकर यांनी सूचक विधान केले आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच शिवसेनेला एकावर एक धक्के बसत आहेत. एकाबाजूला शिंदे गटाचे मोठे बंड, दुसऱ्या बाजूला अनिल परब यांची ईडीकडून सलग चौकशी सुरू असताना, यात भर म्हणून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यामध्ये कारखान्याची २०० एकर जमीन आणि यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वी याच कारखान्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यानंतर आता या कारखान्याच्या जमिनीच्या जप्तीचा निर्णय ईडीकडून घेण्यात आला आहे. यामध्ये कारखान्याची इमारत, संबधित जमीन आणि त्यातील यंत्रसामग्री या सर्वांचा समावेश आहे. या कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अर्जुन खोतकर संचालक असलेला हा कारखाना

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे या कारखान्याच्या संचालक मंडळावर असल्याचे सांगितले जात आहे. या कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार नातेवाइक आणि इतरांच्या सहकार्याने चुकीच्या पद्धतीने व्यवहार करण्यात आल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. कारखान्यावर धाड टाकताना याच्या खरेदी सहभागी असलेले औरंगाबादचे एक बिल्डर तसेच मालक यांच्या संबंधित ठिकाणीही ईडीने छापेमारी केली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी ही पहिलीच कारवाई असून, अर्जुन खोतकर यांच्यासह या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

ईडीच्या कारवाईनंतर गुवाहाटीला जाणार का?

ईडीच्या कारवाईच्या वृत्तानंतर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया समोर आली. ईडीने कारखान्यावर नेमकी काय कारवाई केली माहिती नाही. मुंबईहून नाशिकला जात असताना मला ही माहिती मिळाली. अनेकांचे याबाबतीत फोन येत आहेत. तिथे गेल्यावर नेमकी माहिती मिळू शकेल. त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. काय ती कायदेशीर लढाई लढू, असे खोतकर म्हणाले. यावेळी ईडीच्या कारवाईनंतर आता गुवाहाटीला जाणार का, असा प्रश्न अर्जुन खोतकर यांना विचारण्यात आला, त्यावर बोलताना, काय बोलता तुम्ही. असे काहीच होणार नाही, असे खोतकर म्हणाले.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv SenaशिवसेनाArjun Khotkarअर्जुन खोतकरUddhav Thackerayउद्धव ठाकरे