शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्तीच्या अंताचा प्रवास...

By admin | Updated: August 2, 2016 05:13 IST

लेखक, नाटककार, कलाकार या सर्वांनी मिळून अभिव्यक्ती निर्माण केली, पण साहित्याच्या अंताच्या क्षणापाशी आपण येऊन ठेपलो आहोत.

पुणे : लेखक, नाटककार, कलाकार या सर्वांनी मिळून अभिव्यक्ती निर्माण केली, पण साहित्याच्या अंताच्या क्षणापाशी आपण येऊन ठेपलो आहोत. साहित्य संहिता संपली आहे. पूर्वी शब्दांच्या स्पर्शाची भाषा होती, आता शब्द केवळ दृश्यात्मक उरले आहेत. लोकमान्यांनी अभिव्यक्तीच्या आरंभाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण मात्र शंभर वर्षांपूर्वीच्या अभिव्यक्तीच्या अंताकडे जात आहोत. शंभर वर्षांचा हा उलटा प्रवास आहे, असे मत ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले. एस. पी. कॉलेजमधील वादसभेचे उद्घाटन लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त झाले. या वेळी ‘अभिव्यक्ती:आरंभ आणि अंत’ या विषयावर डॉ. देवी बोलत होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, वादसभेचे प्रमुख प्रा. दीपक कर्वे या प्रसंगी उपस्थित होते.आपण किती प्राचीन आहोत, यापेक्षा मागच्या पिढीतील मोठ्या लोकांनी जे तत्त्वज्ञान दिले, त्यावर देशाचे मोठेपण व शहाणपण सिद्ध होत असते. लेखक, नाटककार सर्वांनी मिळून अभिव्यक्ती निर्माण केली. सध्या अवतीभवती नवी सांकेतिक संवाद पद्धत आकार घेत आहे. यामुळे भाषा नाहिशी होण्याचा धोका आहे. असे झाल्यास बोलणारा माणूस फक्त संग्रहालयात पाहायला मिळेल. अभिव्यक्तीच्या अंताकडे आपण जात आहोत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लोकमान्यांना स्वराज्य हे केवळ भौगोलिक राज्य अपेक्षित नव्हते. त्यांनी त्यापुढे जात अभिव्यक्तीचा शोध घेतला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांनी अभिव्यक्तीचा हक्क बजावला म्हणून त्यांना प्राणास मुकावे लागले. त्या अर्थाने हे तीन खून अभिव्यक्तीचे आहेत. जगात एकाच प्रकारची अर्थव्यवस्था आकार घेत असल्याने लोकशाही कुंठत आहे. समंजस लोकशाहीसाठी अभिव्यक्ती आवश्यक असून, वादसभेतून अभिव्यक्ती टिकवता येते. एकापेक्षा अनेक मते असतात व ती ऐकून घेण्याची तयारी असणे हे अभिव्यक्ती असण्याचे लक्षण आहे. आपली सद्सद्विवेकबुद्धी सावरण्याचा ऐतिहासिक क्षण आला आहे, अशा शब्दांत डॉ. देवी यांनी अभिव्यक्तीचे महत्त्व पटवून दिले. (प्रतिनिधी)>जगात एकाच प्रकारची अर्थव्यवस्था?भाषेचा पूल माणसाने बांधला. या गंगेची तुलना केवळ आकाशगंगेशी होऊ शकते. या आकाशगंगेत आता व्यत्यय येत असून, येत्या २५ वर्षांत जगातील सहा हजारपैकी चार हजार भाषा लुप्त झालेल्या असतील, ज्या उरतील, त्या लुळ्या-पांगळ्या स्वरूपात असतील, असे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.लोकमान्यांना स्वराज्य हे केवळ भौगोलिक राज्य अपेक्षित नव्हते. त्यांनी त्यापुढे जात अभिव्यक्तीचा शोध घेतला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांनी अभिव्यक्तीचा हक्क बजावला, म्हणून त्यांना प्राणास मुकावे लागले. त्या अर्थाने हे तीन खून अभिव्यक्तीचे आहेत. जगात एकाच प्रकारची अर्थव्यवस्था आकार घेत असल्याने लोकशाही कुंठत आहे.