शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चैतन्यपूर्ण लयदार रेषांचा सम्राट श्यावक्ष चावडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 05:54 IST

वेरूळमधील लय, अजिंठ्यातली नजाकत आणि खजुराहोमधल्या वास्तवाची मिसळण घेऊन प्रख्यात चित्रकार श्यावक्ष चावडांची चैतन्यपूर्ण रेषा त्यांच्या चित्रांतून प्रवाही होत गेली आहे.

- श्रीराम खाडिलकरवेरूळमधील लय, अजिंठ्यातली नजाकत आणि खजुराहोमधल्या वास्तवाची मिसळण घेऊन प्रख्यात चित्रकार श्यावक्ष चावडांची चैतन्यपूर्ण रेषा त्यांच्या चित्रांतून प्रवाही होत गेली आहे. अशा या महान भारतीय कलाकाराच्याकलाकृतींचे सिंहावलोकनी प्रदर्शन २० डिसेंबर २०१८ रोजी सुरू झाले असून येत्या ६ जानेवारी २०१९ पर्यंत रसिकांना पाहता येणार आहे. अभ्यासू आणि जिज्ञासूंबरोबरच कलेचे शिक्षण घेणाऱ्या नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरणारे हे महत्त्वाचे प्रदर्शन आहे.पॉल गोगँ या विश्वविख्यात कलाकारांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ‘‘ज्यांना रेषेतून व्यक्त होता येत नाही असे कलाकार रंगचित्रे काढतात.’’ असे श्लेष असलेले ते वाक्य बºयाच गोष्टी सूचित करीत असते. मात्र, त्यातला रेषेचा संदर्भ थेट प्रख्यात भारतीय चित्रकार श्यावक्ष चावडा (जन्म १९१४ ते मृत्यू १९९०) यांच्याशी जाऊन मिळतो असे आपण बेधडक म्हणू शकतो. याला कारण आहे. ते असे की, फक्त रेषा हाच स्थायीभाव असलेल्या अत्यंत दर्जेदार आणि अभिजात असलेल्या कलाकृती या कलाकाराने घडवल्या. रेषेवर या कलाकाराचा प्रचंड जीव होता आणि हुकूमतही होती.मुंबईत सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये मिळालेल्या शिक्षणाहूनही अधिक कला शिक्षण मिळवण्याच्या ध्यासापायी चावडांनी शिष्यवृत्ती मिळवून थेट लंडन गाठले आणि तिथल्या स्लेड स्कूल आॅफ फाईन आर्ट्समध्ये कलाशिक्षण घेणे सुरू केले. नंतरच्या काळात प्रत्यक्ष काम करताना तसेच त्यांच्या विचारांची बैठक पक्की होण्यासाठी या शिक्षणाचा त्यांना खूपच फायदा झाला. कलेतल्या नव्या विचारांच्या आविष्कारांच्या झंझावातामध्येही जबरदस्त आत्मविश्वास असलेले चावडा स्वत:च्या शैलीत ठामपणे कलानिर्मिती करत राहिले. अचूकपणा आणि तरीही सहजता हे चावडांच्या रेखाटनांचे गुण आहेत. ही गोष्ट त्यांची ही रेखाचित्रे आणि रंगचित्रे पाहताना जाणवते.चावडांच्या चित्रांतल्या रेषेबद्दल लिहिताना नेमके शब्द सापडत नाहीत. तरीही त्यांच्या रेषेचे वर्णन करताना इतकेच म्हणता येईल की चित्रातली रेषा विलक्षण लयदार, गतिमान, पूर्वनियोजित मार्गावरून एखादे रॉकेट जावे अशा आश्वासक पद्धतीची तसेच चैतन्याची जाणीव करून देणारी आहे. वेरूळमधली लय, अजिंठ्यातली नजाकत आणि खजुराहोमधल्या वास्तवाची मिसळण घेऊन ती चावडांच्या चित्रांतून प्रवाही होत गेली आहे. खरेतर, रेषा हेच त्यांचे जगणे होते. रेषेची प्रतारणा त्यांनी कधी केली नाही. उलट आयुष्यभर तिची साधनाच केली.प्रत्येक कामासाठी स्वत:च्या समोर ते विशिष्ट मॉडेल उभे करून नंतरच त्याचे रेखाटन करण्याच्या त्यांच्या सवयींमुळे चित्रणात सतत अचूकपण दिसत गेले. रेषा प्रशंसन्ति आचार्या: असे म्हणतात. दृश्यकलेचा विचार करताना रेषा ही सर्वांत प्रभावीपणे भाव व्यक्त करीत असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसेच त्यानंतर भाव व्यक्त करायला उपयोगी पडतात ते रंग. या दोन माध्यमांपैकी रेषेवर चावडांचा विलक्षण जीव असल्याचे कोणत्याही विषयावरील त्यांच्या रंगचित्रांचे निरीक्षण करताना आपल्याला दिसते. याचा परिणाम असा होतो की रंग भाववाही असले तरी या कलाकाराच्या चित्रात ते असूनही गौणच आहेत असे भासत राहते. त्यांनी काढलेल्या शास्त्रीय अथवा बॅले नर्तक - नर्तिकांच्या चित्रांमध्ये ताल, संतुलन, जबरदस्त ऊर्जा त्यात स्पष्टपणे जाणवतेच; त्याचबरोबर नव्या आकृतीबंधाची दृश्यरूपेही नकळतच उलगडत जातात. इतकेच नाहीतर, प्राणी-पक्षी यांच्या प्रतिमा असलेल्या कलाकृती असोत. सगळ्याच कलाकृतींमधून सौंदर्य झिरपत राहते ते आधी रेषेमुळे आणि नंतर रंगांमुळे. त्यांच्या चित्रांमधल्या रंगांमध्येही खूपच साधेपणा आहे. हा साधेपणा त्यांच्या स्वभावातून आला असला पाहिजे असे वाटते. साधेपणा आणि भाववाही रेषा यांच्या मिश्रणातून अस्तित्वात आलेली त्यांची कलाविष्काराची दुनिया लोभसवाणी आहे. चावडांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनी होणाºया मुंबईतल्या वरळीत नेहरू सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनात याचा अनुभव नक्कीच येईल.(लेखक दृश्यकला अभ्यासक, कलासमीक्षक आणि चित्रकार आहेत.)

टॅग्स :artकला