शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

मागणी घटल्याने सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पातून विजेचे उत्पादन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 13:20 IST

एनटीपीसीचे महाप्रबंधक नवकुमार सिन्हा यांनी दिली माहिती; पावसामुळे विजेचा वापर झाला कमी

ठळक मुद्देपावसामुळे ७ आॅक्टोबरपासून विजेचा वापर साहजिकच कमी झालाउत्पादित केलेली वीज विकली जात नव्हती, त्यामुळे उत्पादन बंद१५ नोव्हेंबरनंतर पुन्हा विजेचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता

सोलापूर : सध्या विजेची मागणी घटली आहे. देशभरात हीच स्थिती असून पॉवरग्रीडकडून वीज स्वीकारली जात नसल्याने फताटेवाडी येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून विजेचे उत्पादन थांबवण्यात आल्याची माहिती एनटीपीसीचे महाप्रबंधक नवकुमार सिन्हा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

फताटेवाडी येथील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिन्हा बोलत होते. पावसामुळे ७ आॅक्टोबरपासून विजेचा वापर साहजिकच कमी झाला. मागणीही घटली. उत्पादित केलेली वीज विकली जात नव्हती, त्यामुळे उत्पादन बंद करणे हाच एकमेव पर्याय एनटीपीसीसमोर होता. अन्य वीज निर्मिती केंद्रातही यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ १५ नोव्हेंबरनंतर पुन्हा विजेचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता नवकुमार सिन्हा यांनी व्यक्त केली.

एनटीपीसी हायड्रोपॉवर, कोलपॉवर आणि सोलर एनर्जी क्षेत्रात सध्या काम करते़ देशातील सर्वात मोठी वीज उत्पादित करणारी कंपनी असून एकूण वीज उत्पादनात २३ टक्के उत्पादन करून आर्थिक, सामाजिक विकासात एनटीपीसीचे योगदान मोठे असल्याचा दावा सिन्हा यांनी केला. यापुढच्या काळात सोलर एनर्जीच्या क्षेत्रात ही कंपनी अधिक काम करणार आहे. लवकरच सोलापूर युनिटमध्येही सोलर एनर्जी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर वीज निर्मिती केंद्राची उत्पादन क्षमता १३२० मेगावॅट आहे़ या केंद्रातून वार्षिक ४० हजार मिलियन युनिटचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते़ आतापर्यंत ६०० मिलियन युनिट वीज निर्मिती करण्यात आली, उर्वरित काळात उद्दिष्ट साध्य करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेला एनटीपीसीचे प्रकल्प महासंचालक रजत चौधरी, के. व्यंकटय्या, जॉन मथाई, विनय वानखेडे, दीपक शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

तापमान घटल्याचा दावाएनटीपीसीमुळे सोलापूर शहर आणि परिसरातील तापमानात वाढ झाल्याची चर्चा गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे़ या चर्चेचे खंडन करताना फताटेवाडीच्या प्रकल्पात चारही दिशेला १२५ इतर क्षेत्रात तीन लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे़ प्रकल्पातून धुराचे उत्सर्जन अतिशय कमी होते. प्रदूषण नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली असून पर्यावरण मंत्रालयाशी ती आॅनलाईन जोडण्यात आली आहे़ एनटीपीसी प्रकल्प हरितपट्टा बनला असून तापमान वाढले नाही तर ते कमी झाल्याचा दावा महाप्रबंधक नवकुमार सिन्हा यांनी केला. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनीही याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले़

डिजिटलायझेशनसाठी तरतूद- एनटीपीसीने होटगी स्टेशन,आहेरवाडी येथे पाण्याच्या उंच टाक्या, होटगी स्टेशन जि.प.शाळेच्या चार वर्गखोल्या,फताटेवाडीत दोन अंगणवाड्या,१५० शौचालये यासाठी जिल्हा परिषदेकडे २.१२ कोटी निधी वर्ग केला आहे.यंदा जि.प.च्या शाळेतील ७० वर्गखोल्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व निधी) मधून १ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणPower ShutdownभारनियमनRainपाऊस