शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडणुकीआधी पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 05:35 IST

भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला.

मुंबई : भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. निवडणुकांआधी आणखी एक हल्ला होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा कार्यकर्त्यांचा ठाकरे शैलीत समाचार घेतला. जवानांच्या शौर्यावर संशय नसून सरकारच्या माहितीवरच विश्वास नाही. हल्ल्याची पूर्वसूचना मिळूनही एअरलिफ्ट करण्याऐवजी जवानांना त्या धोकादायक रस्त्यावरून पाठवले. एअर स्ट्राइकमध्ये १० लोकही मेले नाहीत. जवानांचा हकनाक बळी गेल्यानंतरही कुणी साधा प्रश्नही उपस्थित करायचा नाही का, असा सवाल त्यांनी केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप, दाऊदचे प्रत्यार्पण, राम मंदिर या सर्व मुद्द्यांवर अपयशी ठरल्याने अशा घटना घडवल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पाकिस्तानचे १० लोक जरी मारले असते, तरी इम्रान खान यांनी कॅप्टन अभिनंदन यांना सोडले नसते. त्यामुळे भाजपाकडून केले जाणारे सर्व दावे साफ खोटे आहेत, असे ते म्हणाले.ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा!सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना ठोकून काढा, असे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. मुद्द्याला मुद्द्याचा विरोध असेल, तर ठीक आहे. मात्र शिव्या देणाºया ट्रोलर्सला पुरावे तपासत घरातून बाहेर काढून ठोकून काढा, असे राज ठाकरे म्हणाले.पंतप्रधान बेफिकीर!देशात युद्धजन्य परिस्थिती असताना पंतप्रधान कोरियामध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असतील, तर ते बेफिकीर असल्याची टीकाही राज यांनी केली. पुलवामा हल्ल्यापासून एअर स्ट्राइक होईपर्यंत रोज पंतप्रधानांनी बदललेल्या कपड्यांचे फोटोच राज यांनी जाहीर सभेत दाखवले. जवानांहून व्यापारी अधिक शौर्य दाखवतात, असे पंतप्रधानांचे वक्तव्य असलेला व्हिडीओ दाखवत राज यांनी संताप व्यक्त केला.राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्नराफेलच्या दर्जाबाबत प्रश्न नसून त्याचे काम उद्योगपती अनिल अंबानी यांना का दिले?चीनसोबत वाद सुरू असताना चिनी पदार्थांवर बंदी लादण्याची मागणी करणाºया भाजपा कार्यकर्त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचा चीनने तयार केलेला पुतळा कसा चालतो?भारतीयांना मारल्यानंतर पाकच्या सैनिकाला आपण सोडणार नसू, तर ३००हून अधिक लोक मारल्यानंतर पाकने अभिनंदनला का सोडले?

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तान