शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन        

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 07:00 IST

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देमहाविद्यालयांमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया अधिक जवळून अनुभवता येईल, अशी शक्यता व्यक्त

पुणे: महाविद्यालयांतीलविद्यार्थी निवडणुका खुल्या पध्दतीने घेतल्या जाणार असल्या तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारात निवडणुकीसाठी प्रचार व प्रसार करता येणार नाही. कोणत्याही संघटनांचा पाठिंबा घेवून पोस्टर,बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी गर्दी करून संवाद साधता येणार नाही. केवळ प्राचार्यांनी दिलेल्या ठराविक जागेत स्वत:ची भूमिका स्पष्ट करून मतदान करण्याचे आव्हान करता येईल. त्यामुळे महाविद्यालयात इलेक्शन होणार आहे की सिलेक्शन असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुकांबाबत प्राचार्यांच्या कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. त्यात विद्यार्थी निवडणुकांबाबतची प्रक्रिया स्पष्ट केली जात आहे. मात्र,महाविद्यालयीन निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या जाचक नियमावलीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही पध्दतीने निवडणुक लढवता येणार नाही. त्यामुळे देशातील इतर राज्यात ज्या पध्दतीने खुल्या निवडणुका होतात,त्याच पध्दतीने महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना निवडणुक लढविण्याची संधी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सुमारे मंत्रिपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी संघटनांची बैठक घेवून महाविद्यालयात खुल्या पध्दतीने निवडणुका घेण्याबाबत चर्चा केली होती.त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, विद्यार्थी संघटनांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेशच दिला जाणार नसल्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.महाविद्यालयांमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया अधिक जवळून अनुभवता येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारात स्वत:ची भूमिका मांडण्यासाठी मोकळीक दिली गेली नाही. तर पूर्वीच्या निवडणूक पध्दतीत आणि नव्या विद्यापीठ कायद्यानुसार घेतल्या जाणा-या निवडणुक पध्दतीत फरक राहणार नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे इलेक्शन घ्यावे  त्यांचे सिलेक्शन करू नये,असे विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींकडून सांगितले जात आहे.----------------विद्यार्थ्यांना खुल्या पध्दतीने निवडणुक लढविण्याची संधी मिळाली पाहिजे.पूर्वीच्या पध्दतीनुसारच या पुढील काळात निवडणुक घेतली तर विद्यार्थ्यांना निवडणुक प्रक्रियेचे ज्ञान मिळणार नाही.त्यामुळे शासनाने यात आवश्यक सुधारणा कराव्यात.कल्पेश यादव, अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.---------------------महाराष्ट्रातील विद्यार्थी निवडणुका या इतर राज्यात ज्या पध्दतीने होतात,त्याच पध्दतीने व्हाव्यात.दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत विविध संघटनांना निवडणुक प्रक्रियेत सहभागी होता येते.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात निवडणुका झाल्या पाहिजेत.महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे इलेक्शन व्हावे;सिलेक्शन नको.- किरण साळी, उपशहर प्रमुख,शिवसेना

......................

विद्यार्थी निवडणुका लोकशाही पध्दतीने झाल्या पाहिजेत.लोकसभा,विधानसंभेवर प्रतिनिधी निवडून जातात.त्याचप्रमाणे विद्यार्थी महाविद्यालयातून निवडून यावेत.तसेच विद्यार्थी संघटनांना महाविद्यालयीन निवडणूकांमध्ये प्रवेश दिला जाणार नसेल तर शिक्षण मंत्र्यांनी सर्व विद्यार्थी संघटनांच्या बैठका का घेतल्या होत्या.निर्बंध घालून निवडणूका घेतल्या तर विद्यर्थ्यांमधून नेतृत्व उभे राहणार नाही. - ॠषी परदेशी,अध्यक्ष ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

.......................

विद्यार्थी संघटनांना महाविद्यालयीन निवडणूकांपासून दूर ठेवणे योग्य नाही.विलासराव देशमुख,नितीन गडकरी,गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते विद्यार्थी निवडणुकांमधूनच तयार झाले.त्यामुळे महाविद्यालयात खुल्या पध्दतीने निवडणुका घेतल्या जाव्यात.तसेच या निवडणुकांमध्ये विद्यार्थी संघटनांना सामावून घ्यावे.- अक्षय जैन,एनएसयुआय,राष्ट्रीय प्रतिनिधी

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीdemocracyलोकशाही