शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाने सांगूनही महायुतीकडून आचारसंहितेचा भंग; 'त्या' २०० निर्णयांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:23 IST

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. अशातच महाराष्ट्रातील महायुती सरकारने आठवडाभरापासून सरकारी निर्णयांची धडाका लावला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयांची मालिका सुरूच होती. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे आयोगाने बुधवारी जाहीर केले आहे. त्याचवेळी महायुतीने वापरलेल्या 'व्होट जिहाद' या शब्दाचीही आयोग चौकशी करणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी दुपारी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सुमारे २०० सरकारी प्रस्ताव, नियुक्त्या आणि निविदा सरकारी वेबसाइटवर प्रसिद्ध केल्यामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आले आहे. हे निर्णय जाहीर करताना महायुती सरकारने आचार आदर्शाचा भंग केल्यामुळे या प्रकरणाची सध्या निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू आहे. आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने वेबसाइटवरून अनेक नोटिसा काढून टाकल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर बुधवारी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून दिवसभर शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आयोगाने म्हटलं की यात आमदारांना निधी वाटप आणि इतर अनेक प्रशासकीय मान्यतेशी संबंधित अध्यादेशांचा समावेश आहे. त्यामुळे दुपारी ३.३० नंतर जे काही शासन निर्णय जाहीर केले गेले ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे का, याची तपासणी केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाला लिहीलेल्या पत्रात कुंभार यांनी म्हटलं की महाराष्ट्र सरकारने १५ आणि १६ ऑक्टोबर दरम्यान १०० हून अधिक ठराव वेबसाईटवरुन काढून टाकले. "आधी वेबसाइटवर ३४९ सरकारी ठराव दिसत होते. मात्र आता ही संख्या २४७ पर्यंत कमी झाली आहे. हे ठराव गायब होण्यामागील कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. हे ठराव वेबसाइटवरून काढून टाकणे म्हणजे गैरवर्तनाची कबुली मानली जाऊ शकते," असे कुंभार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

आचारसंहिता लागू झाल्यावर हे ठराव जाहीर करण्यात आले होते, असा दावा विजय कुंभार यांनी केला आहे. तर याद्वारे जनतेची दिशाभूल केली गेली असेही कुंभार म्हणाले. "जरी प्रस्ताव सरकारी वेबसाइटवरून काढून टाकले गेले असले तरी ते आधीच लागू केले गेले असावेत. त्यांच्या अंमलबजावणीमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे," असेही विजय कुंभार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीAAPआप