शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

निवडणूक आयोगाने सांगूनही महायुतीकडून आचारसंहितेचा भंग; 'त्या' २०० निर्णयांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:23 IST

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. अशातच महाराष्ट्रातील महायुती सरकारने आठवडाभरापासून सरकारी निर्णयांची धडाका लावला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयांची मालिका सुरूच होती. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे आयोगाने बुधवारी जाहीर केले आहे. त्याचवेळी महायुतीने वापरलेल्या 'व्होट जिहाद' या शब्दाचीही आयोग चौकशी करणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी दुपारी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सुमारे २०० सरकारी प्रस्ताव, नियुक्त्या आणि निविदा सरकारी वेबसाइटवर प्रसिद्ध केल्यामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आले आहे. हे निर्णय जाहीर करताना महायुती सरकारने आचार आदर्शाचा भंग केल्यामुळे या प्रकरणाची सध्या निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू आहे. आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने वेबसाइटवरून अनेक नोटिसा काढून टाकल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर बुधवारी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून दिवसभर शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आयोगाने म्हटलं की यात आमदारांना निधी वाटप आणि इतर अनेक प्रशासकीय मान्यतेशी संबंधित अध्यादेशांचा समावेश आहे. त्यामुळे दुपारी ३.३० नंतर जे काही शासन निर्णय जाहीर केले गेले ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे का, याची तपासणी केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाला लिहीलेल्या पत्रात कुंभार यांनी म्हटलं की महाराष्ट्र सरकारने १५ आणि १६ ऑक्टोबर दरम्यान १०० हून अधिक ठराव वेबसाईटवरुन काढून टाकले. "आधी वेबसाइटवर ३४९ सरकारी ठराव दिसत होते. मात्र आता ही संख्या २४७ पर्यंत कमी झाली आहे. हे ठराव गायब होण्यामागील कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. हे ठराव वेबसाइटवरून काढून टाकणे म्हणजे गैरवर्तनाची कबुली मानली जाऊ शकते," असे कुंभार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

आचारसंहिता लागू झाल्यावर हे ठराव जाहीर करण्यात आले होते, असा दावा विजय कुंभार यांनी केला आहे. तर याद्वारे जनतेची दिशाभूल केली गेली असेही कुंभार म्हणाले. "जरी प्रस्ताव सरकारी वेबसाइटवरून काढून टाकले गेले असले तरी ते आधीच लागू केले गेले असावेत. त्यांच्या अंमलबजावणीमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे," असेही विजय कुंभार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीAAPआप