शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
3
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
4
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
5
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
6
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
7
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
8
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
9
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
10
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
11
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
12
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
13
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
14
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
15
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
16
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
17
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
18
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
19
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
20
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Eknath Shinde: विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? एकनाथ शिंदेंचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 15:55 IST

Eknath Shinde Speech in Vidhan Sabha: विधानसभेत विश्वासमत जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गेल्या पंधरवड्यामध्ये झालेल्या सर्व आरोपांना आणि टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अभिनंदन प्रस्तावानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यानचा घटनाक्रम आणि बंडाला मिळालेल्या समर्थनाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे

मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाने पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज विधानसभेत विश्वासमत जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गेल्या पंधरवड्यामध्ये झालेल्या सर्व आरोपांना आणि टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अभिनंदन प्रस्तावानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यानचा घटनाक्रम आणि बंडाला मिळालेल्या समर्थनाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं आहे. गेले १५-२० दिवस शिवसेना आणि सहयोगी पक्षांचे आमदार माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं, त्यांचं अभिनंदन करतो. आभार मानतो. कारण आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अनेक घटना पाहिल्या. तर लोकप्रतिनिधीन असलील, आमदार खासदार असतील तर ते विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे वाटचाल करतात. मात्र माझ्यासोबत आलेल्या मंत्र्यांनी स्वत:चं मंत्रिपद पणाला लावून आमदारकी पणाला लावून, बलाढ्य सरकार मोठमोठी माणसं, मोठमोठे मंत्री यांचा दबाव झुगारून एका सामान्य शिवसैनिकावर विश्वास ठेवून मोठा निर्णय घेतलाय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीदरम्यान, सुरू झालेल्या बंडाबाबतही मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले. ज्या दिवशी विधानभवनातून आम्ही निघालो. त्याच्या आदल्या दिवशी मी अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी मतदान होतं. त्या दिवशी मला जी वागणून मिळाली. माझ्याशी ज्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न झाला त्याचे साक्षीदार इकडचे आणि तिकडचे आमदार आहेत, असे ते एकनाथ शिंदे म्हणाले.

मी नम्रपणे सांगू इच्छतो की, त्यावेळी मला तेव्हा काय झालं माहिती नाही. बाळासाहेब नेमही सांगायचे की अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी बंड असेल उठाव असेल काही असेल केला पाहिले. माझा फोन फिरू लागला आणि धडाधड लोक जमू लागलो. कुठे जातोय काय करतोय, कशासाठी जातोय कुणी काही विचारलं नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही निघाल्यानंतर जयंत पाटील, अजित पवार, मुख्यमंत्री महोदयांचाही फोन आला. इतरांचेही फोन आले. काही लपवू इच्छित नाही. मला विचारलं,  कुठे चाललात? मी म्हणालो मला माहिती नाही. कधी येणार? मी म्हटलं मला माहिती नाही. आमच्या आमदारांनाही फोन आले, पण एकाही आमदारानं असं म्हटलं नाही की, आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊया. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा त्यांचा विश्वास आहे.  हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. माझं खच्चिकरण कसं होत होतं, हे सुनील प्रभू यांनाही माहिती आहे. त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माधार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. एकटा शहीद होईन. एकटा शहीद होईन बाकीचे वाचतील. मी सांगितलं होतं की चिंता करू नका. ज्या दिवशी मला वाटेल तुमचं नुकसान होतंय, त्यादिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा निरोप घेऊन निघून जाईन, असं मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र