शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विधान परिषदेत शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'?; उद्धव ठाकरेंची नवी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 09:23 IST

विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांची बैठक ९ जुलै रोजी पार पडली. या विरोधी पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद निवडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आले

मुंबई -  अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे २ आमदार निवडून आल्याने परिषदेत त्यांचे संख्याबळ १३ इतके झाले आहे. विरोधी पक्षात काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असल्याने आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेता शिवसेनेचा नेमण्यात यावा याचा ठराव विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे आमदारांनी दिला आहे. 

विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांची बैठक ९ जुलै रोजी पार पडली. या विरोधी पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद निवडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आले अशी माहिती आमदार सुनील शिंदे यांनी दिली. सध्याच्या आकडेवारीत विधान परिषदेत महाविकास आघाडीत सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर दावा करणारे पत्र शिवसेनेच्या आमदारांनी उपसभापतींना दिले आहे. यात आमदार अंबादास दानवे, सचिन आहिर, मनिषा कायंदे, विलास पोतनीस, सुनील शिंदे इत्यादी उपस्थित होते. 

येत्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत सभापती, विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार आहे. यापूर्वीचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची ७ जुलै रोजी मुदत संपली. ते विधान परिषदेत पुन्हा निवडून आलेत. मात्र कार्यकाळ संपल्यामुळे परत परिषदेच्या सभागृहात सभापतीपदासाठी निवडणूक होईल. त्यात सत्ताधारी भाजपा-शिंदे गट सभापतीपदासाठीही उमेदवार उतरवणार आहे. विधानसभेत भाजपाचे राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांना १६४ मते मिळाली होती. विधान परिषदेत शिवसेनेचा विरोधी पक्षनेता बनल्यास सभागृहात शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या कारभारावर आक्रमकपणे भाष्य करणाऱ्या आमदाराच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडू शकते.  “शरद पवार हवेत की शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवे”कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती. त्यांनी साथ सोडली का? शेवटपर्यंत शरद पवार त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत. आम्ही मात्र, त्यांना दूरचे झालो आहोत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नाही. आमच्या मित्रपक्षाने देखील त्यांच्यावर भाष्य करू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारा मनाचा मोठेपणा उद्धव यांच्याकडेदेखील आहे. आता, उद्धव यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या संघर्षाचा शेवट गोड होणार असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषद