शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; २३ जणांना मिळणार संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 08:54 IST

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ३० जून २०२२ रोजी घेतली होती. त्यानंतर ४० दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील सरकारला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यावर कोर्टाच्या निर्णयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच विस्तार होईल असं उत्तर दिले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार स्थिर असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार करणे शिंदे-फडणवीस यांच्यासमोरील आव्हान असणार आहे. सध्या कॅबिनेटमध्ये २० मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात आणखी २३ जणांना संधी मिळू शकते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ३० जून २०२२ रोजी घेतली होती. त्यानंतर ४० दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यात १८ जणांचा समावेश करण्यात आला होता. 

राज्यमंत्रिमंडळात ४३ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. त्यामुळे २३ नव्या मंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यात शपथ दिली जाऊ शकते. शिंदेंसोबत गेलेल्या ५० आमदारांपैकी ९ जणांना पहिल्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. माहितीनुसार एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतच्या १४ जणांना मंत्रिपदाची संधी देऊ शकतात. तर भाजपामध्ये मंत्रिपदासाठी अनेक उत्सुक आहेत. परंतु इच्छुक नेते आणि भाजपाचे वरिष्ठ नेते यांच्यात बैठका होतील. त्यानंतर दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. 

सध्याच्या मंत्रिमंडळात एकही अपक्ष आमदार नाही ज्यांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत महिला नेत्याचाही समावेश नाही. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला सातत्याने लक्ष्य केले. परंतु सुप्रीम कोर्टात सरकारच्या भवितव्याचा निर्णय प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. आता कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षBJPभाजपा