शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

"लोकांनी केलेली टीका, त्यांचे प्रश्न सहन झाले नाही म्हणून फेसबुक कमेंट सेक्शन बंद केलं का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 21:43 IST

एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक सवाल

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले. हे सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी भाजपा आणि शिंदे गट यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. पण एकनाथ शिंदे सत्तास्थापना झाल्यानंतर बरेच वेळा दिल्लीवारी करताना दिसले. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली. तशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पत्रकार परिषद आपल्या फेसबूक पेजवरून लाईव्ह केली होती. त्यावेळी त्यांनी फेसबुकवरील कमेंट्सचा पर्याय बंद ठेवला होता. त्यावरून राष्ट्रवादीने त्यांना काही कात्रीत पकडणारे सवाल केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका करत सवाल केली. "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांशी संवाद होऊ नये अशी तरतूद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीवारी करत असल्यामुळे अनेक लोक फेसबुकवरच मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारतात. प्रसंगी कडक भाषेत टीका करतात. ही टीका, प्रश्न सहन झाले नसावेत म्हणून हे कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे का? मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांची इतकी भीती का वाटावी? असा प्रश्न आता सोशल मीडिया युजर्सना पडला आहे", अशा शब्दांत NCP च्या अधिकृत फेसबूक पेजवरून मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आले.

दरम्यान, राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आधी हे अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती होती. पण या संदर्भात राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले असून अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. ९ ऑगस्ट म्हणजे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे विस्तारानंतर किमान एक आठवडा मंत्र्यांना आपल्या खात्याचा आढावा आणि अभ्यास करता यावा या हेतुने अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसFacebookफेसबुक