शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांनी केलेली टीका, त्यांचे प्रश्न सहन झाले नाही म्हणून फेसबुक कमेंट सेक्शन बंद केलं का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 21:43 IST

एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक सवाल

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले. हे सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी भाजपा आणि शिंदे गट यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. पण एकनाथ शिंदे सत्तास्थापना झाल्यानंतर बरेच वेळा दिल्लीवारी करताना दिसले. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली. तशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पत्रकार परिषद आपल्या फेसबूक पेजवरून लाईव्ह केली होती. त्यावेळी त्यांनी फेसबुकवरील कमेंट्सचा पर्याय बंद ठेवला होता. त्यावरून राष्ट्रवादीने त्यांना काही कात्रीत पकडणारे सवाल केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका करत सवाल केली. "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांशी संवाद होऊ नये अशी तरतूद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीवारी करत असल्यामुळे अनेक लोक फेसबुकवरच मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारतात. प्रसंगी कडक भाषेत टीका करतात. ही टीका, प्रश्न सहन झाले नसावेत म्हणून हे कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे का? मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांची इतकी भीती का वाटावी? असा प्रश्न आता सोशल मीडिया युजर्सना पडला आहे", अशा शब्दांत NCP च्या अधिकृत फेसबूक पेजवरून मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आले.

दरम्यान, राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आधी हे अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती होती. पण या संदर्भात राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले असून अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. ९ ऑगस्ट म्हणजे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे विस्तारानंतर किमान एक आठवडा मंत्र्यांना आपल्या खात्याचा आढावा आणि अभ्यास करता यावा या हेतुने अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसFacebookफेसबुक