शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

संजय राऊत शिवसेनेत पण काम राष्ट्रवादीचं करतात; शिंदे गटाचे आमदार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 14:11 IST

पुढील रणनीती बैठकीत ठरते. जे काही करायचं ते महाराष्ट्राच्या हिताचे असेल. त्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी यांना नेहमी आदर होता आणि आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सातत्याने संजय राऊत यांनी सर्वोच्च नेत्यांचा अपमान करणारी विधाने केली. उद्धव ठाकरे सांगतात, वैयक्तिक टीका केली नाही. परंतु बाळासाहेबांचे संबंध, मातोश्रीसोबत असलेलं नाते हे गृहित धरता अशी विधानं यायला नको होती ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे संजय राऊत जितकं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे असा टोला दीपक केसरकर यांनी राऊतांना लगावला. 

पाठित खंजीर खुपसण्याची भाषा राऊतांनी करू नये शिवसेना पक्षावर कुणीही दावा केला नाही. विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. हा वाद तत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिले त्यांचीच युती झाली आहे. पाठित खंजीर खुपसण्याची भाषा संजय राऊतांनी करू नये. शिवसेनेत राहायचं आणि निम्म काम राष्ट्रवादीचं करायचं. सकाळी ९ वाजता एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र-राज्यात वाद लावून द्यायचा हेच सुरू आहे. महाराष्ट्राची प्रगती करायची असेल केंद्र आणि राज्य शासनात एकोपा लागतो. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जो काही निर्णय एकनाथ शिंदे घेतील त्यांच्यासोबत आम्ही सगळे आमदार आहोत असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला. 

सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. प्रत्येक आमदारांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. पुढील रणनीती बैठकीत ठरते. जे काही करायचं ते महाराष्ट्राच्या हिताचे असेल. त्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनीही जे पद सोडलं शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला होता. शिवसेना मराठी माणसाची अस्मिता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघाली होती. अनेक पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचं काम करत होते. प्रत्येकजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडली आहे. परंतु निर्णयाला खूप उशीर झाला अशीही माहिती केसरकरांनी दिली. 

कुणीही वाईट वाटून घेऊ नये कार्यकर्त्यांना आमच्या मागे लावले गेले. वाहनं आमची पाठलाग करत होते. त्यामुळे नेते दुखावले गेले. शिवसेनेत ठाकरे कुटुंबावर कुणाचा विरोध नाही. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. १४ आमदारांच्या सहाय्याने ४० जणांनी निवडलेल्या नेत्याला काढून टाकण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना विनंती करत होतो. महाविकास आघाडीशी साथ सोडा असं पत्र दिले. परंतु शेवटपर्यंत मविआची साथ सोडली नाही. आदर, विश्वास, प्रेम प्रत्येक आमदारांना उद्धव ठाकरेंबद्दल आहे. आम्ही मुदत दिली होती त्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कुणीही वाईट वाटून घेऊ नये असं केसरकरांनी म्हटलं.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत