शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत शिवसेनेत पण काम राष्ट्रवादीचं करतात; शिंदे गटाचे आमदार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 14:11 IST

पुढील रणनीती बैठकीत ठरते. जे काही करायचं ते महाराष्ट्राच्या हिताचे असेल. त्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी यांना नेहमी आदर होता आणि आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सातत्याने संजय राऊत यांनी सर्वोच्च नेत्यांचा अपमान करणारी विधाने केली. उद्धव ठाकरे सांगतात, वैयक्तिक टीका केली नाही. परंतु बाळासाहेबांचे संबंध, मातोश्रीसोबत असलेलं नाते हे गृहित धरता अशी विधानं यायला नको होती ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे संजय राऊत जितकं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे असा टोला दीपक केसरकर यांनी राऊतांना लगावला. 

पाठित खंजीर खुपसण्याची भाषा राऊतांनी करू नये शिवसेना पक्षावर कुणीही दावा केला नाही. विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. हा वाद तत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिले त्यांचीच युती झाली आहे. पाठित खंजीर खुपसण्याची भाषा संजय राऊतांनी करू नये. शिवसेनेत राहायचं आणि निम्म काम राष्ट्रवादीचं करायचं. सकाळी ९ वाजता एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र-राज्यात वाद लावून द्यायचा हेच सुरू आहे. महाराष्ट्राची प्रगती करायची असेल केंद्र आणि राज्य शासनात एकोपा लागतो. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जो काही निर्णय एकनाथ शिंदे घेतील त्यांच्यासोबत आम्ही सगळे आमदार आहोत असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला. 

सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. प्रत्येक आमदारांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. पुढील रणनीती बैठकीत ठरते. जे काही करायचं ते महाराष्ट्राच्या हिताचे असेल. त्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनीही जे पद सोडलं शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला होता. शिवसेना मराठी माणसाची अस्मिता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघाली होती. अनेक पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचं काम करत होते. प्रत्येकजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडली आहे. परंतु निर्णयाला खूप उशीर झाला अशीही माहिती केसरकरांनी दिली. 

कुणीही वाईट वाटून घेऊ नये कार्यकर्त्यांना आमच्या मागे लावले गेले. वाहनं आमची पाठलाग करत होते. त्यामुळे नेते दुखावले गेले. शिवसेनेत ठाकरे कुटुंबावर कुणाचा विरोध नाही. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. १४ आमदारांच्या सहाय्याने ४० जणांनी निवडलेल्या नेत्याला काढून टाकण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना विनंती करत होतो. महाविकास आघाडीशी साथ सोडा असं पत्र दिले. परंतु शेवटपर्यंत मविआची साथ सोडली नाही. आदर, विश्वास, प्रेम प्रत्येक आमदारांना उद्धव ठाकरेंबद्दल आहे. आम्ही मुदत दिली होती त्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कुणीही वाईट वाटून घेऊ नये असं केसरकरांनी म्हटलं.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत