शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Maharashtra Political Crisis:"स्वाभिमानाने जगू, राखेतून पुन्हा उभे राहू", शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:15 IST

Eknath Shinde Revolt: शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत.

Eknath Shinde Revolt: शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबत 35-40 आमदार घेऊन गेले असून, राज्यातील सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. यातच, संजय राऊतांनी राज्यातील राजकीय प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने आहे, असे ट्वीट केले होते. त्यावर आता शिवसेनेच्या एका बड्या नेत्याची प्रतिक्रिया आली आहे.

'स्वाभिमानाने जगू, पण...'"आम्ही स्वाभिमान गहान ठेवलेला नाही. राखेतून पुन्हा उभे राहू", असे सूचक विधान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे. एका वृत्त वाहिनीशी ते बोलत होते. यावेळी सावंत म्हणाले की, "नार्वेकरांना एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी किती वेळ लागला, सरकार कोसळणार का याची मला कल्पना नाही. आम्ही कधीच सत्तेची पर्वा केलेली नाही. स्वाभिमानाने जगू, पण शरणार्थी म्हणून नाही,'' अस सावंत म्हणाले.

'राणे-राज ठाकरे गेले तेव्हाही...'सावंत पुढे म्हणाले की, ''आम्ही कधीच स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. मुठभर मावळे घेऊन जगू, पुन्हा राखेतून उभे राहू. जनता दलापासून हे होत आलं आहे. राज ठाकरे, नारायण राणे जेव्हा गेले तेव्हादेखील राजकीय भूकंप असे शब्द वापरले गेले. मात्र शिवसेना पुन्हा उभा राहिली. मुळात शिवसेना ही आमदारांमुळे नाही, शिवसैनिकांमुळे आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. त्यात पुढील दिशा ठरेल,'' असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेArvind Sawantअरविंद सावंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना