शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...

By प्रविण मरगळे | Updated: June 27, 2022 17:06 IST

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे

प्रविण मरगळे 

महाराष्ट्रातील राजकारणात सध्याची परिस्थिती पाहिली तर केवळ घराणेशाही, प्रस्थापित मंडळी यांच्यासाठीच सगळं काही, हे चित्र दिसून येते. कार्यकर्ता म्हटला तर नेत्यावर जीव ओवाळून टाकणारा, त्याची निस्सीम 'भक्ती' करणारा माणूस. हा कार्यकर्ता अलीकडे प्रचंड संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतं. कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न त्याला पडू लागलाय. तरीही, तो अजूनही श्रद्धेनं आपल्या 'विठ्ठला'ची पूजा करतोय. पण, खांद्यावरचा तो झेंडा (कुठल्याही रंगाचा, शिक्क्याचा असो) थोडा बाजूला ठेवून त्यानं थोडा विचार करायची गरज आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी अक्षरश: रिक्षावाले, पानटपरी चालवणाऱ्या तळागाळातील व्यक्तींना सोबत घेऊन 'शिवसेना' नावाची संघटना बनवली. पुढे या संघटनेचे रुपांतर राजकीय पक्षात झाले. बाळासाहेबांनी गरीब घरातील मुलं राजकारणात आणली. कुणी नगरसेवक, कुणी आमदार तर कुणी खासदार झाले. संघर्षाच्या काळात साथ देऊन अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व उदयास आणले. मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी बाळासाहेबांनी तरुणांमध्ये ज्योत पेटवली आणि याच ज्योतीची मशाल घेऊन शिवसेनेत अनेक नेते बनले. परंतु, अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांप्रती लोकांमध्ये असलेली आपुलकीची भावना कुठेतरी नष्ट होताना दिसत आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. अर्थातच, या घडामोडींवर सगळ्यांचं लक्ष आहे. पण, 'कार्यकर्ता' नावाचा गट ज्या प्रकारे रिएक्ट होतोय, तो काळजीचा मुद्दा आहे. अर्थात, हे नवं नाही.  

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते ज्यांनी ११ वेळा विधानसभेत विजय मिळवला. एकनिष्ठ आणि एकच पक्ष असलेला असा लोकनेता पुन्हा होणे नाही. आजच्या राजकीय नेत्यांकडे पाहिले तर जिथे सत्ता तिथे चांगभलं. शेवटी राजकारणात सत्तेला अधिक महत्व असतं. राजकीय नेते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या मार्गाने वाटचाल करत असतात. कुणी टेंडरसाठी भांडते तर कुणी निधीसाठी, कुणावर ईडीची कारवाई होते तर कुणाच्या घरी कोट्यवधीचं घबाड सापडते. मात्र या सर्व घडामोडीत कार्यकर्त्यांचं काय होतं? 

नुकतेच एका नेत्यांच्या २ कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लीप ऐकायला मिळाली. नेते निवडणुका लढवणार, जिंकणार, पैसा कमवणार आणि कार्यकर्ते केवळ घोषणाबाजी, राडेबाजी, आंदोलन, मारामारी करायला पुढे जाणार. त्यात २०१९ नंतरच्या राजकारणानं कार्यकर्त्यांना जास्तच कन्फ्यूज केले आहे. आपण ज्या नेत्यांच्या मागेपुढे करतो ते नेते एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. समोर आले तर हात जोडून नमस्कार करतात. गळ्यात गळे घालतात. मात्र याच्याच विरुद्ध चित्र कार्यकर्ते समोरासमोर आले एकमेकांची डोकी फोडणार, कार्यालयं फोडणार, स्वत:वर गुन्हे दाखल करून घेणार, जेलमध्ये रात्र घालवणार अशीच बहुतांश प्रतिमा तयार झाली आहे. या ऑडिओ क्लीपमधील एक वाक्य मनाला भिडलं, ते म्हणजे 'आम्ही नेत्यांशी एकनिष्ठ पण नेतेच झाले बहुनिष्ठ" हे वाक्य आजच्या परिस्थितीला तंतोतंत जुळणारे आहे. 

सध्या शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोर झालेत. शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. बंडखोर नेते हॉटेलमध्ये मुक्काम करतात आणि नेतृत्व मातोश्री ते शिवसेना भवन व्हाया वर्षा असा प्रवास करतात. सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात एक विधान केले. तुमचा मुलगा खासदार, माझा मुलगा बडवा, कसं चालेल? याचा साधा अर्थ असा की नेतेमंडळी स्वत:चं कुटुंब स्वत:ची जबाबदारी म्हणून सांभाळतात. नेत्याचा मुलगा नेताच असतो पण त्या कार्यकर्त्याचं काय जो नेत्यासाठी जीवाचं रान करतो? महाविकास आघाडीच्या राजकारणात तर आजवर ज्यांच्याशी भांडलो त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून नेत्यांनी सत्ता उपभोगली. परंतु, ज्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या, नेत्यांसाठी स्वत:च्या घराकडे दुर्लक्ष केले त्यांचे पुढे काय? आतातरी कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा, स्वत:च्या कुटुंबाकडे, बायका-पोरांसाठी वेळ द्यावा!

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी