शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Eknath Shinde: शिवसेना आमदारांची बैठक संपली; ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:47 IST

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबत पक्षाचे अन्य आमदारांचे फोनही बंद झाले.

मुंबई - राज्यात विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेचे १८ आमदार उपस्थित होते. मात्र राज्यात घडणाऱ्या घडामोडीवर शरद पवारांनी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. 

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबत पक्षाचे अन्य आमदारांचे फोनही बंद झाले. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाची चिंता वाढली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावलं. वर्षा बंगल्यावर दुपारी १२ वाजता ही बैठक होणार होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले. परंतु या बैठकीत केवळ १८ विधानसभेचे आमदार उपस्थित असल्याने शिवसेनेला किती मोठा फटका बसला आहे याचा अंदाज येऊ शकतो. परंतु काही आमदार ऑन दे वे असल्याचं पक्षातील नेत्यांनी दावा केला. 

बैठकीला कोण कोण उपस्थित होते?वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, नरेंद्र दराडे, रवींद्र वायकर, मंगेश कुडाळकर, राहुल पाटील, उदय सामंत, प्रकाश फातर्पेकर, दिलीप लांडे, गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय पोतनीस, संतोष बांगर, सुनील प्रभू, राजन साळवी, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सदा सरवणकर या आमदारांनी हजेरी लावली. 

बैठकीत काय घडलं?  या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या सरकारला काहीही धोका नाही. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही आणि आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक आहोत. आपल्याला एकत्र राहायचं आहे असा विश्वास त्यांनी आमदारांना दिला. मुंबईत सेंट रेजीस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्या आमदारांसोबत शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि गटप्रमुख ही साखळी ठेवण्यात आली आहे. तुर्तास या आमदारांमध्ये कुठली फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. सरकारला धोका नाही - शरद पवारदिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हवं की नाही हे माहिती नाही. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे तेच यावर भूमिका घेऊ शकतात. शिवसेनेची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे जे भूमिका घेतील त्यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग झाल्यानंतरही सरकार चालतं हा माझा ५० वर्षाचा राजकीय अनुभव आहे असं त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे