शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांना शिवभोजन थाळी, NCP-काँग्रेसला मोठमोठी पदं दिली”; शिंदे गटाचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:29 IST

Maharashtra Political Crisis: तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही शिवसैनिकाला लाचार व्हायला लावले, अशी घणाघाती टीका शिंदे गटातील खासदाराने केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे.  दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्षही तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेतील गळती थांबता थांबत नसून, राज्यभरातून एकनाथ शिंदेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढताना दिसत आहे. यातच आता शिंदे गटात सामील झालेल्या एका खासदाराने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

किती दिवस लोकांच्या तोंडाकडे बघायचे? लोकांकडे वर्गणी मागायची. आमच्या वर्गण्यांची संभावना तुम्ही (काँग्रेस, राष्ट्रवादी) खंडणी म्हणून केली. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही आम्हाला लाचार व्हायला लावले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तोंडाकडे आम्हाला बघायला लावले. ही लाचारी आम्हाला मान्य नव्हती, असा हल्लाबोल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला. 

स्वाभिमान दुखावण्याचे महाविकास आघाडीच्या सरकारने केले

आम्ही १९९५ चे युती सरकार बघितले. त्यावेळी शिवसेनेने १ रुपयात झुणका भाकर विकायला लावली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आले. १० रुपयांत तुम्ही शिवभोजन थाळी विकायला लावली. एकीकडे राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालये देत आहेत, मोठी पदे देत आहेत आणि माझा शिवसैनिक एक रुपयात झुणका भाकर विकतोय. १० रुपयांत शिवभोजन थाळी विकतोय. त्याचा स्वाभिमान दुखावण्याचे काम या मागच्या सरकारने केले, असा गंभीर आरोप हेमंत पाटील यांनी केला. 

तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती

तुम्हाला कुठेतरी पदावर बसायचे होते. तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती. तुम्हाला सत्ता भूषवायची होती. म्हणून ज्या लोकांनी ३५-३७ वर्षे आमच्यावर अत्याचार केले. त्यांना तुम्ही जवळ करून बसलात. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला आणि आमचे निर्दालन केले. कुठचे पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वमान्यांना न्याय नव्हता, असा घणाघात हेमंत पाटील यांनी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे कशाप्रकारचा घडलेला माणूस आहे. दररोज २०-२० तास काम करतात. कधी मास्क नाही. कुणी हात पुढे केला तर लगेच हात मिळवतात. कुठलीही अस्पृश्यता बाळगत नाही, असे म्हणत हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळHemant Patilहेमंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे