शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “संभाजीराजेंना उमेदवारी न देणे ही गद्दारी नाही का?”; शिंदे गटाचा शिवसेनेला रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:09 IST

Maharashtra Political Crisis: विधान भवन परिसरात विरोधकांपैकी घोषणा न देणारे काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. शिंदे गट आणि ठाकरे सेनेत आरोप-प्रत्यारोप तीव्र होत असून, संभाजीराजेंना नाकारलेली उमेदवारी ही गद्दारी नाही का, अशी विचारणा शिंदे गटातील मंत्र्याने केली आहे. 

प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येणार म्हणत सहानुभूती मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याचे नवनिर्वाचित उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच संभाजीराजेची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी होऊ शकत नाही का? असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे. प्रति शिवसेना भवन उभारण्याचा कोणताही संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला नसून मध्यवर्ती कार्यालय असावे अशी भूमिका असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, याचा पुनरुच्चार उदय सामंत यांनी यावेळी बोलताना केला. राज्यात स्थापन झालेल्या भाजप-सेना सरकारमधील एकनाथ शिंदे गटातील शिवसेना समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थिती लावली होती. 

आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले

विधानभवनाबाहेर झालेल्या बाचाबाची दरम्यान घोषणा न देणाऱ्या विरोधकांमधील काही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचे आवाहन केले असले तरीही आम्ही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांचा निर्णय बंधनकारक आहे, असे उदय सामंत यांनी नमूद केले. घटनापीठाकडे जे प्रकरण सुरू आहे त्यावर जाहीरपणाने बोलणे योग्य नसल्याचे उदय सामंत म्हणाले. 

दरम्यान, आगामी काही दिवसात शिवसेनेची निशाणी आम्ही घेणार असून घटनापीठाकडे गेलेला वाद हा आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता नाही. आपण पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन आपण तोडले असून येत्या निवडणुकीत भाजप-सेना २००चा आकडा पार करण्याचा चमत्कार करणार असल्याचा दावा भरत गोगावले यांनी यावेळी केला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती