शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ खडसेंनी माझा छळ केला, विनयभंगाच्या तक्रारीतून ते अजून सुटलेले नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 06:56 IST

खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुक्ताईनगर येथे बोलताना आपल्याबाबत अत्यंत अश्लिल, असभ्य भाषा वापरली होती आणि त्या विरुद्ध आपण मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

मुंबई : अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्याविरुद्ध विनयभंगाची खोटी केस केली, असा आरोप करणाऱ्या खडसेंनी आपल्याला खूप छळले, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला. दमानियांनी केलेल्या तक्रारीतून मी अलिकडेच सुटलो हे खडसे यांचे विधान धादांत खोटे असून माझ्या तक्रारीच्या प्रकरणातून ते अजिबात सुटलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या.

खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुक्ताईनगर येथे बोलताना आपल्याबाबत अत्यंत अश्लिल, असभ्य भाषा वापरली होती आणि त्या विरुद्ध आपण मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मुक्ताईनगरच्या पोलिसांनी आपला त्या संदर्भात दोनवेळा जबाब घेतला. न्यायालयातदेखील आपण बाजू मांडली. ३२ ठिकाणी माझ्याविरुद्ध अवमानना खटले दाखल केले. माझ्याविरुद्ध ते वाट्टेल तसे बोलत असतात. फडणवीस यांच्या सांगण्यावरुन मी तक्रार का द्यावी? खडसे आणि फडणवीसांचे काय राजकारण आहे ते त्यांना लखलाभ पण एक स्री म्हणून जाहीर सभेत माझ्याविरुद्ध काहीही बोलले जात असेल तर मी चूप का राहायचे, असा सवाल दमानिया यांनी केला.

मी आतापर्यंत नितीन गडकरी, अजित पवार, छगन भुजबळ अशा नेत्यांविरुद्ध लढा दिला, तसाच तो खडसेंविरुद्धही देत आहे. सर्व ताळतंत्र सोडून एका महिला सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध खडसे वाट्टेल ते बोलले होते, त्यांना धडा शिकवणारच हा निर्धार मी सुरुवातीपासूनच केला होता, असे दमानिया म्हणाल्या. 

 

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाeknath khadseएकनाथ खडसेMaharashtraमहाराष्ट्रMolestationविनयभंग