शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांसह आठजणांना अटक

By admin | Updated: October 23, 2014 23:06 IST

सांगेली येथे बिबट्याची शिकार : गवसे येथे कातड्याची विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

आजरा : सांगेली (ता. सावंतवाडी) येथे पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना गडहिंग्लज पोलिसांनी गवसे येथे आजरा साखर कारखान्यासमोर रंगेहाथ पकडले. संभाजी रामदास साळुंखे (वय ३२, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) व तानाजी रंगराव पाटील (४५, रा. माणिकवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी या दोघांची नावे असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला व तीन शिकाऱ्यांसह आठजणांना अटक केली आहे. गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस खबऱ्यांकडून सांगेली (ता. सावंतवाडी) येथे नीलेश राजाराम नार्वेकर (५०), विशाल परशुराम नार्वेकर (२४) व चंद्रकांत भुजू राऊळ (७३) यांनी पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याची हत्या केली होती. त्याचे कातडे मोहन नानासाहेब देसाई (५०, रा. सुलगाव, ता. आजरा) व आक्काताई जनार्दन सणगर (५५, रा. के. बी. पी. कॉलेजजवळ, इस्लामपूर) या मध्यस्थांतर्फे विक्रीसाठी साळुंखे व पाटील हिरो होंडा मोटारसायकल (एमएच १० बीटी २७०४)वरून घेऊन निघाले होते.यावेळी गडहिंग्लज पोलिसांनी सापळा रचून साळुंखे व पाटील यांना गवसे येथे रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी व दुचाकी जप्त केली आहे. बिबट्याची हत्या करणाऱ्या सांगेली येथील आरोपींनी विनापरवाना वापरलेली १८ हजार रुपयांची सिंगल बार काडतुसी बंदूक आणि काडतुसेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थ, कातडी विक्रीसाठी नेणारे दोघेजण, सांगेली येथील शिकारी, तेथील अंजली राजाराम नार्वेकर (५०) हिच्यासह एकूण आठजणांना अटक केली आहे. गडहिंग्लज न्यायालयात उभे केले असता संभाजी साळुंखे, तानाजी पाटील, मोहन देसाई यांना एक दिवसाची पोलीस कोठडी, तर उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. ही कारवाई गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)आजरा पोलीस करतात तरी काय ?सावंतवाडी-आजरा-सांगली हा मार्ग अवैध वाहतुकीचा मार्ग बनल्याचे गेल्या अनेक दिवसांतील घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, यामध्ये स्थानिक आजरा पोलीस कुठेच दिसले नाहीत. कोल्हापूरहून पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी पकडलेला चरस, तर कधी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली आहे. त्यामुळे आजरा पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.