शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

पुढच्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:41 IST

मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’

ठळक मुद्देगणरायाला दिला निरोप : सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’ च्या जयघोषात पुढच्या वर्षी येण्याचे साकडे घालत सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी (दि.५) निरोप दिला. विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुका दिसत होत्या.विघ्नहर्ता व मांगल्याच्या देवताच्या उत्सवाची परिसरासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांत ख्याती आहे. त्यात शहरातील गणपती उत्सवाची बात काही औरच आहे. येथील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणारा उत्सव शहराची शानच आहे. त्यामुळे बाहेरगावहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास येतात. २५ आॅगस्ट रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपतीच्या उत्सवाचे हे दिवस नवचैतन्याचेच असतात. त्यामुळेच हे १२ दिवस भुर्रकन निघून गेले व अखेर दिवस उजाडला तो लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा. मंगळवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे चित्र होते. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर, कुणी रिक्शात तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना घेऊन विसर्जनासाठी नदी व तलावांवर जात असल्याचे चित्र होते. यात गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणूका आकर्षणाचे केंद्रच होत्या. ढोलताशांवर नाचत गात तरूणाई गुलाल उधळत ‘गणपती बाप्पा मोरया... ’चा जयघोष करीत जात असल्याचे दिसून आले. मागल्यांचे देवता गणपती यंदा १२ दिवस आपल्या घरात विराजमान असल्याने त्यांना सहाजीकच भारी मनाने निरोप देण्यात आला. मात्र पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रणही बाप्पांना देण्यात आले.प्रथमच डिजेविना विसर्जनशासनाने डिजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला शहरातील व जिल्ह्यातील गणेश मंडळांनी साथ देत डिजेचा वापर टाळीत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले.मंगळवारी सर्वाधिक विसर्जनव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मंडळांना विसर्जनासाठी दिवस वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार २ तारखेपासूनच विसर्जनाला सुरूवात झाली आहे. तर शेवटचे विसर्जन ९ तारखेला होणार असल्याचे दिसून येत आहे. यात मात्र मंगळवारी (दि.५) सर्वाधिक विसर्जन करण्यात आले. शहर पोलिसांनी ४८ मंडळांना तर रामनगर पोलिसांनी २० मंडळांना विसर्जनाच्या तारखा दिल्या होत्या. शिवाय हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, गणपती विसर्जनाच्या तारखांना घेऊन पोलीस विभागाकडून शेवटचा दिवस कोणता हे कळले नाही. तर रामनगर पोलिसांकडून ठरवून दिलेल्या तारखांबाबत संभ्रम होता.विसर्जनस्थळांवर गर्दीशहरातील पांगोली नदी छोटा गोंदिया- खमारी, सरकारी तलाव, साई मंदिर नाग तलाव, रजेगाव घाट, छोटा गोंदिया देवतलाव येथे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्यामुळे या विसर्जन स्थळांवर एकच गर्दी दिसून आली. शहरात हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींची स्थापना केली जात असल्याने त्यात सार्वजनिक मंडळांची भर पडत असल्याने विसर्जन स्थळांवर भाविकांची एकच गर्दी दिसून आली.शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्तविसर्जनाला सुरूवात झाली असून सुरक्षा व व्यवस्थेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. बंदोबस्तांतर्गत चौकाचौकांत पोलीस कर्मचाºयांची ड्यूटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्या सोबत होते. तसेच विसर्जन स्थळांवरही पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त होता. याशिवाय पेट्रोलींग पथक व पोलीस निरीक्षकांचे पथक सुद्धा नजर ठेऊन होते.