शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:51 AM

अर्जुन खोतकरांसोबत माझे वैयक्तिक भांडण नाही

- विजय सरवदे

युती होण्यापूर्वी रुसवा-फुगवा होता. आता युती झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपा उमेदवारांचा प्रचार करतील, तर भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील. नाही तर शेवटी ‘बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात,’ अशा शेलक्या शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाराजांना चिमटा काढला. दानवे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास धावती भेट दिली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कसलाही आडपडदा न ठेवता अगदी दिलखुलास गप्पा मारल्या.

प्रश्न : खोतकरांनी तुमच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्याचं काय?उत्तर : अर्जुनराव आणि माझं कसलंही भांडण नाही. वाद होता तो युती तुटल्याचा. आता युती झाली आहे. त्यामुळं त्यांचा राग कमी होईल.

प्रश्न : काही ठिकाणी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवाराची कामं करतील...उत्तर : सेना-भाजपाचा मतदार एकच आहे. त्यामुळं युतीमध्ये एकमेकांच्या उमेदवारांची कामं करावीच लागतील. नाही तर शेवटी ‘बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात.’ ज्याला असं वाटतं की, या बेट्याचं पाहून घेऊ. त्या बेट्यालाही मग वाटतं, याचंही पुढं पाहून घेऊ. प्रत्येक जण आपलं भविष्य शोधत असतो. ‘शिर सलामत, तो पगड़ी हजार’ याप्रमाणं जे होणार आहे, ते होणारच आहे. त्यामुळं कशाला आपण उगीच विरोधात उडी घ्यायची, असाही विचार होतो.

प्रश्न : तुम्हाला अशा चपखल म्हणी कशा काय सुचतात?उत्तर : माझा ग्रामीण टच आहे. मी एकदा गावात भाषण करीत होतो. आताच युरिया का मुबलक भेटतो, असं शेतकऱ्यांनी विचारलं. तेव्हा म्हणालो, तुमच्यापैकी कोणी-कोणी बकºया वळल्या. समोरून दोन हात वर केले गेले. मग, मी त्यांना म्हणालो, बकरीमागं दिवसभर पिलं सोडली, तर बकरीला दूध राहील का. समोरून उत्तर आलं, नाही. दूध राहण्यासाठी बकरीला आळपणं घालावं लागतं किंवा कडुनिंब ठेचून लेप लावावा लागतो.सत्तारांची प्रतिज्ञा...हे बघा, लोक बाभळीच्या झाडाला दगड मारत नसतात, ते आंब्याच्याच झाडाला मारत असतात. आज माझ्या शब्दाला किंमत आहे. काही जणांना ते पटत नाही म्हणून विरोधक प्रतिज्ञा करीत असतात.( काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्या पराभवासाठी प्रतिज्ञा केली आहे.)राज्यात कसे वाटते?मी सरपंच होतो. तेव्हा खूप इमानदारीनं काम केलं. मग, मी पंचायत समिती सभापती झालो. लोकांनी मला आमदार केलं. खासदार केलं. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच यादीत माझं नाव होतं. केंद्रीय मंत्री झालो. मोदीं साहेबांनी मला संघटना वाढीचं काम दिलं. माझ्या मतदारसंघासाठी ६ हजार कोटींची कामं हाती घेतली आहेत.या वेळी किती यश मिळेल?राज्यामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४२ जागा जिंकल्या होत्या. यंदा आम्ही ४३ जागा जिंकू, ४१ होणार नाहीत.आता मोदींनी निमकोट’ युरिया आणला आहे. हा युरिया उद्योजकांनी त्यांच्या युरियात मिसळला की, तो खराब होतो. - रावसाहेब दानवे

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाArjun Khotkarअर्जुन खोतकर