शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:52 IST

अर्जुन खोतकरांसोबत माझे वैयक्तिक भांडण नाही

- विजय सरवदे

युती होण्यापूर्वी रुसवा-फुगवा होता. आता युती झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपा उमेदवारांचा प्रचार करतील, तर भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील. नाही तर शेवटी ‘बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात,’ अशा शेलक्या शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाराजांना चिमटा काढला. दानवे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास धावती भेट दिली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कसलाही आडपडदा न ठेवता अगदी दिलखुलास गप्पा मारल्या.

प्रश्न : खोतकरांनी तुमच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्याचं काय?उत्तर : अर्जुनराव आणि माझं कसलंही भांडण नाही. वाद होता तो युती तुटल्याचा. आता युती झाली आहे. त्यामुळं त्यांचा राग कमी होईल.

प्रश्न : काही ठिकाणी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवाराची कामं करतील...उत्तर : सेना-भाजपाचा मतदार एकच आहे. त्यामुळं युतीमध्ये एकमेकांच्या उमेदवारांची कामं करावीच लागतील. नाही तर शेवटी ‘बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात.’ ज्याला असं वाटतं की, या बेट्याचं पाहून घेऊ. त्या बेट्यालाही मग वाटतं, याचंही पुढं पाहून घेऊ. प्रत्येक जण आपलं भविष्य शोधत असतो. ‘शिर सलामत, तो पगड़ी हजार’ याप्रमाणं जे होणार आहे, ते होणारच आहे. त्यामुळं कशाला आपण उगीच विरोधात उडी घ्यायची, असाही विचार होतो.

प्रश्न : तुम्हाला अशा चपखल म्हणी कशा काय सुचतात?उत्तर : माझा ग्रामीण टच आहे. मी एकदा गावात भाषण करीत होतो. आताच युरिया का मुबलक भेटतो, असं शेतकऱ्यांनी विचारलं. तेव्हा म्हणालो, तुमच्यापैकी कोणी-कोणी बकºया वळल्या. समोरून दोन हात वर केले गेले. मग, मी त्यांना म्हणालो, बकरीमागं दिवसभर पिलं सोडली, तर बकरीला दूध राहील का. समोरून उत्तर आलं, नाही. दूध राहण्यासाठी बकरीला आळपणं घालावं लागतं किंवा कडुनिंब ठेचून लेप लावावा लागतो.सत्तारांची प्रतिज्ञा...हे बघा, लोक बाभळीच्या झाडाला दगड मारत नसतात, ते आंब्याच्याच झाडाला मारत असतात. आज माझ्या शब्दाला किंमत आहे. काही जणांना ते पटत नाही म्हणून विरोधक प्रतिज्ञा करीत असतात.( काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्या पराभवासाठी प्रतिज्ञा केली आहे.)राज्यात कसे वाटते?मी सरपंच होतो. तेव्हा खूप इमानदारीनं काम केलं. मग, मी पंचायत समिती सभापती झालो. लोकांनी मला आमदार केलं. खासदार केलं. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच यादीत माझं नाव होतं. केंद्रीय मंत्री झालो. मोदीं साहेबांनी मला संघटना वाढीचं काम दिलं. माझ्या मतदारसंघासाठी ६ हजार कोटींची कामं हाती घेतली आहेत.या वेळी किती यश मिळेल?राज्यामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४२ जागा जिंकल्या होत्या. यंदा आम्ही ४३ जागा जिंकू, ४१ होणार नाहीत.आता मोदींनी निमकोट’ युरिया आणला आहे. हा युरिया उद्योजकांनी त्यांच्या युरियात मिसळला की, तो खराब होतो. - रावसाहेब दानवे

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाArjun Khotkarअर्जुन खोतकर