शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

राज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 02:16 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवेच्या ३४२ पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच मराठा आरक्षणांतर्गत (सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग) २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवेच्या ३४२ पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच मराठा आरक्षणांतर्गत (सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग) २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (६९ जागा) यंदा जागांची संख्या वाढल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी (४० जागा), पोलीस उपअधीक्षक (३४ जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (१६ जागा), उद्योग उपसंचालक (२ जागा), तहसीलदार (७७ जागा), उपशिक्षणाधिकारी (२५ पदे), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (३ जागा), कक्ष अधिकारी (१६ जागा), सहायक गट विकास अधिकारी (११ जागा), उद्योग अधिकारी (५ जागा), नायब तहसलीदार (११३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या पूर्व परीक्षेसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आॅनलाइन अर्ज भरायचे आहेत. पूर्वपरीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यातील ३७ केंद्रांवर घेतली जाणार आहे. या पूर्वपरीक्षेत पात्र ठरणाºया विद्यार्थ्यांची १३ ते १५ जुलै २०१९ मध्ये मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.राज्यसेवेची मागील वर्षी केवळ ६९ पदांसाठी जाहिरात निघालेली होती. राज्यभरात लाखो विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करीत असताना इतक्या कमी जागांची जाहिरात निघाल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर यंदा भरतीच्या पदांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.उपशिक्षणाधिकाºयांची २५ पदेराज्य आयोगाकडून यंदा उपशिक्षणाधिकारी पदाच्या २५ जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत उपशिक्षणाधिकारीपदाच्या जागा निघाल्या नव्हत्या, यंदा चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राज्यसेवेंतर्गत २८ विविध प्रकारच्या पदांची भरतीप्रक्रिया राबविली जाते. यंदाच्या जाहिरातीनुसार ११ संवर्गातील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सहायक संचालक, उद्योग संचालक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आदी पदांसाठी तांत्रिक अर्हता पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. राज्य आयोगाकडून एकूण १३०० गुणांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये पूर्वपरीक्षा ४०० गुण, मुख्य परीक्षा ८०० गुण व मुलाखतीसाठी १०० गुण असणार आहेत.जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता...राज्यसेवेअंतर्गत २८ विविध प्रकारच्या पदांची भरतीप्रक्रिया राबविली जाते. यंदाच्या जाहिरातीनुसार ११ संवर्गातील ३४२ रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जाहिरातील नमूद केलेल्या या जागांव्यतिरिक्त पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत जागांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीव जागा पूर्वपरीक्षेच्या निकालात विचारात घेण्यात येतील, तसेच मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे त्या जाहीर करण्यात येतील, असे आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.जात प्रमाणपत्र आवश्यकमराठा आरक्षणाच्या (सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग) प्रवर्गातील उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी (मुलाखतीच्या वेळेस) ७ डिसेंबर २०१८ अन्वये विहित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी १५ जुलै २०१४ अन्वये जात प्रमाणपत्र काढले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल, असे आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी