शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

तापमानवाढीमुळे माेसमाचे चक्र बदलल्याने दुष्काळ, पाण्याची टंचाई; रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 07:51 IST

येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियानुसार, देशस्तरावर ९१ टक्के लोकांनी जागतिक तापमानवाढीबाबत चिंता व्यक्त केली असली, तरी जागतिक तापमानवाढ ही मुख्यतः मानवी कृतींमुळे होत असल्याचे फक्त ५५ टक्के लोकांना वाटते.

मुंबई : राज्यातील ८७ टक्के नागरिकांनी जागतिक तापमानवाढीचे परिणाम स्वतः अनुभवल्याचे सांगितले असून, ७७ टक्के जणांना तापमानवाढीचा मान्सूनवर परिणाम होत असल्याचे वाटते. तर, ८२ टक्के जणांनी या समस्येमुळे दुष्काळ व पाणीटंचाई जाणवते, असे सांगितले. हे प्रमाण देशातील सर्वाधिक पातळीवरील असल्याचे येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियाच्या अहवालातून समोर आले.

सप्टेंबरमध्ये राज्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. अनेक जिल्ह्यांतील जीवन विस्कळीत झाले. बदलत्या हवामानाचा शहरे आणि शेतकऱ्यांवर परिणाम होत आहे. अनियमित पाऊस आणि मान्सूनचा बदललेला पॅटर्न यामुळे पिकावर परिणाम होत असून, मुंबईपासून मराठवाड्यापर्यंतच्या नागरी पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. 

९० टक्के दिवस तीव्र हवामानाच्या घटना२०२४ मध्ये भारतात ३२२ दिवस म्हणजे वर्षभरातील ९०% दिवस तीव्र हवामानाच्या घटना नोंद झाल्या.  राष्ट्रीय स्तरावर, बहुतेक लोकांनी १२ महिन्यांत तीव्र उष्णतेच्या लाटा (७१ टक्के), शेतीवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव (५९ टक्के), वीजपुरवठा खंडित होणे (५९ टक्के), पाण्याचे प्रदूषण (५३ टक्के), दुष्काळ व पाण्याची टंचाई (५२ टक्के) आणि तीव्र हवा प्रदूषण (५१ टक्के) यांचा वैयक्तिक अनुभव आल्याचे सांगितले.

हवामानाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील लोक वातावरण बदलाबाबत काय विचार करतात आणि त्यांचा अनुभव काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. - डॉ. जगदीश ठाकर, प्रकल्प प्रमुख

तापमानवाढीबाबत भारतीयांना काय वाटते?

तीव्र उष्णतेच्या लाटा    ७८%दुष्काळ व पाणीटंचाई    ७७%तीव्र चक्रीवादळे    ७३%मोठ्या पुरांच्या घटना    ७०%

English
हिंदी सारांश
Web Title : Climate Change Disrupts Weather, Fuels Droughts: Report Reveals Maharashtra's Plight

Web Summary : Maharashtra faces rising droughts and water scarcity due to climate change. A report indicates that 87% of citizens have experienced its effects, with 82% linking it to drought and water shortages. Extreme weather events impacted lives and agriculture.
टॅग्स :weatherहवामान अंदाज