शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, आता तीन हेक्टर मर्यादेत मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 09:49 IST

चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार, कायद्यात सुधारणेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. दुष्काळी परिस्थितीत केंद्र सरकारकडून राज्यांना जी मदत दिली जाते ती तातडीने मिळावी, यासाठी केंद्राला विनंती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली जाणार आहे. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून, रबी पेरण्यादेखील संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत १२ टक्के रबी पेरण्या झालेल्या आहेत, अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

जिल्हानिहाय दुष्काळ जाहीर झालेले ४० तालुके

  • नंदुरबार : नंदुरबार
  • जळगाव : चाळीसगाव
  • जालना : भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा
  • छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर
  • नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला
  • पुणे : पुरंदर, सासवड, बारामती
  • बीड : वडवनी, धारुर, अंबाजोगाई
  • लातूर : रेणापूर
  • धाराशिव : वाशी, धाराशिव, लोहारा,
  • सोलापूर : बार्शी, माळशिरस, सांगोला.
  • धुळे : सिंदखेडा 
  • बुलढाणा : बुलढाणा, लोणार
  • पुणे : शिरूर घोड नदी, दौंड, इंदापूर
  • सोलापूर : करमाळा, माढा
  • सातारा : वाई, खंडाळा
  • कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज
  • सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत  करण्याचा निर्णय घेण्यात आला. जून ते ऑक्टोबर २०२३ या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले.  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर मर्यादेत मदत केली जात होती. त्यामध्ये १ हेक्टरची वाढ करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत २ हेक्टर मर्यादेत मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांनाही २ हेक्टर मर्यादेत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार - कायद्यात सुधारणेचा निर्णय

चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  चिटफंड कायद्यानुसार राज्य कर विभागाचे सहनिबंधक यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दोन महिन्यांच्या मुदतीत वित्तमंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. सध्या प्रलंबित असलेल्या चिटफंड अपिलांची संख्या पाहता व न्यायदानास होणारा विलंब टाळण्याकरिता राज्य शासनास असलेले अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान करण्यात येणार आहेत. अपील सुनावणीतील या बदलामुळे प्रलंबित अपिलांचा निपटारा वेगाने होईल.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र