शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, आता तीन हेक्टर मर्यादेत मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 09:49 IST

चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार, कायद्यात सुधारणेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. दुष्काळी परिस्थितीत केंद्र सरकारकडून राज्यांना जी मदत दिली जाते ती तातडीने मिळावी, यासाठी केंद्राला विनंती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली जाणार आहे. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून, रबी पेरण्यादेखील संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत १२ टक्के रबी पेरण्या झालेल्या आहेत, अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

जिल्हानिहाय दुष्काळ जाहीर झालेले ४० तालुके

  • नंदुरबार : नंदुरबार
  • जळगाव : चाळीसगाव
  • जालना : भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा
  • छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर
  • नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला
  • पुणे : पुरंदर, सासवड, बारामती
  • बीड : वडवनी, धारुर, अंबाजोगाई
  • लातूर : रेणापूर
  • धाराशिव : वाशी, धाराशिव, लोहारा,
  • सोलापूर : बार्शी, माळशिरस, सांगोला.
  • धुळे : सिंदखेडा 
  • बुलढाणा : बुलढाणा, लोणार
  • पुणे : शिरूर घोड नदी, दौंड, इंदापूर
  • सोलापूर : करमाळा, माढा
  • सातारा : वाई, खंडाळा
  • कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज
  • सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत  करण्याचा निर्णय घेण्यात आला. जून ते ऑक्टोबर २०२३ या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले.  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर मर्यादेत मदत केली जात होती. त्यामध्ये १ हेक्टरची वाढ करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत २ हेक्टर मर्यादेत मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांनाही २ हेक्टर मर्यादेत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार - कायद्यात सुधारणेचा निर्णय

चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  चिटफंड कायद्यानुसार राज्य कर विभागाचे सहनिबंधक यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दोन महिन्यांच्या मुदतीत वित्तमंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. सध्या प्रलंबित असलेल्या चिटफंड अपिलांची संख्या पाहता व न्यायदानास होणारा विलंब टाळण्याकरिता राज्य शासनास असलेले अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान करण्यात येणार आहेत. अपील सुनावणीतील या बदलामुळे प्रलंबित अपिलांचा निपटारा वेगाने होईल.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र