शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान

By admin | Published: April 10, 2016 3:19 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत, असे उद्गार बॉलीवूड अभिनेते आमीर खान याने काढले.राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘बाबासाहेबांच्या विचारांचा महोत्सव’ या कार्यक्रमात आमीर खान बोलत होता. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, नेपाळचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र पासवान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ संगीतकार हरिहरन, संगीतकार जतीनललित, नाटयनिर्माते राहुल भंडारे, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चव्हाण, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.विश्वेंद्र पासवान यांनी उपस्थितांना बाबासाहेबांची समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण अंमलात आणावी, असे आवाहन केले. प्रकाश आंबेडकर यांनीही परिवर्तनाची भावना कृतीत आणण्यासह पुस्तकातील बाबासाहेब माहिती करून घ्या, असे आवाहन केले. शिवाय रोहित वेमुला याची आई येत्या १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आंबेडकर भवन येथे बौद्ध धर्माची दिक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षदीप कांबळे यांनी पुढील पंचवीस वर्षे आमची समिती विद्यार्थ्यांच्या आणि उद्योजकांच्या मदतीसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचे नमुद केले. दरम्यान, यावेळी गायक अभिजित कोसंबी, गायिका रैना अग्नी, तबलानवाज मुकेश जाधव आणि श्याम जावडा या कलाकारांनी आपआपली कला सादर करत रसिकप्रेक्षकांचे तब्बल पाच तास मनोरंजन केले. शिवाय यावेळी कलाकार राजेश ढावरे यांच्या ‘द ट्रू सन आॅफ इंडिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या अल्बमचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)आमीर खान याने आपल्या भाषणाची सुरुवातच ‘जय भीम...’ असे म्हणत केली. तो म्हणाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मला बोलावण्यात आले याचा आनंद आहे. त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पुरुष होते. बाबासाहेब केवळ दलितांचे नाही तर विश्वाचे नेते आहेत. बाबासाहेबांना मी माझे नेते मानतो. त्यांनी समानतेची शिकवण दिली असून, आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी आपणाला जी शिकवण दिली. जे विचार दिले. ते सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. विशेषत: बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना त्यांची पुस्तकेही वाचा, असे आवाहन आमीर याने केले.