शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:38 IST

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी या दोन्ही प्रकरणांवरून काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

काँग्रेसवर 'दहशतवाद' आणि 'मतपेटी'चे राजकारण केल्याचा आरोपमुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सुटल्यावर सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे, तर मालेगाव प्रकरणात आरोपींची सुटका झाल्यावर मात्र सरकार आनंद व्यक्त करत आहे. ही दोन्ही प्रकरणं काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तपासली गेली, पण दोन्ही ठिकाणी वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.

काय आहे मुंबई आणि मालेगाव प्रकरणातील फरक?मुंबई बॉम्बस्फोट (२००६): या प्रकरणात तपास यंत्रणांनी सिमी (SIMI) या संघटनेच्या आरोपींना अटक केली होती. इंडियन मुजाहिदीनने या स्फोटांची जबाबदारी घेतली होती. मात्र, तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे आरोपी निर्दोष सुटले, असा आरोप आता होत आहे. आता सरकार या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट (२००८): या प्रकरणाचा तपास काँग्रेस आघाडी सरकारने 'भगवा दहशतवाद' हा 'नॅरेटिव्ह' तयार करण्यासाठी केला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे. त्यासाठी खोटे पुरावे तयार करून निरपराध हिंदूंना आरोपी बनवण्यात आले. ही संपूर्ण कारवाई फक्त मतांच्या राजकारणासाठी केली गेली, जेणेकरून 'भगवा दहशतवाद' ही संकल्पना समाजात रुजेल. मात्र, १७ वर्षांनंतर आता या आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे, ज्यामुळे काँग्रेसचा खोटेपणा उघड झाला आहे, असे उपाध्ये म्हणाले.

केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर 'फेक नॅरेटिव्ह' तयार केल्याचा आरोप करत, दोन्ही बॉम्बस्फोटांमध्ये काँग्रेसने दुटप्पी राजकारण केल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटBJPभाजपाcongressकाँग्रेसMumbaiमुंबई