शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

१९९३ ची आठवण काढू नका, काही विषय तिथल्या तिथे बंद करायचे असतात – मंत्री जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 22:03 IST

काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये तुमचे योगदान किती हे पहिले दाखवावे. चित्रपट दाखवून काय होणार? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला विचारला आहे.

रणजित इंगळे

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)) यांच्यावर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले असता आता त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी भाष्य केले आहे. आता १९९३ च्या आठवणी काढू नका.  नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली? पेढे कोणी वाटले गुलाल कोणी उधळला. संविधान कोणी नाकारलं. तिरंगा वाद कोणी केला हे सर्व कुठे काढायचे. आता आपण २०२३ मध्ये जाऊ आता उगाच इतिहास खोदून त्यातील सर्व बाहेर काढणे माझ्या दृष्टीने चुकीचा आहे. काही विषय तिथल्यातिथे बंद करायचे असतात असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, कलम ३७० ला बाबासाहेबांचा विरोध असता तर मग ते संविधानात आलं कसं हे मला समजत नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला पण त्याला विरोध झाला त्या हिंदू कोड बिलमध्ये महिलांना पन्नास टक्के वाटा देण्याचं ठरलं होतं परंतु तेव्हाची परिस्थिती पुरुषप्रधान संस्कृती म्हणून मानले जायचे म्हणून त्या वेळच्या राजकीय नेत्यांना आणि सरकारला तेव्हा महिलांना ५० टक्के देणे योग्य वाटलं नव्हतं परंतु ते बाबासाहेबांना वाटले होते. ३७० वरून कुठेही वाद झालेला मी ऐकला नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये तुमचे योगदान किती हे पहिले दाखवावे. चित्रपट दाखवून काय होणार? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

तसेच इशरत जहाला राष्ट्रवादीने मदत केली असं कोणीही म्हटलं नाही. देवेंद्र फडणवीस काही आरोप करतील खरे मानायचे का? आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर काय द्यावे असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. त्याचसोबत मला जेम्स लेनचा वाद पुन्हा घालायचा नाही जेव्हा तो घालायचा होता तेव्हा हे घरात बसले होते. जेम्स लेनचे पुस्तक पहिल्यांदा बाजारात आमच्या काही मित्रांनी आणले आणि त्यात मुख्य माणूस किशोर ढमाले होते. म्हणून या विषयात पुन्हा मला वाद घालायचा नाही. राज ठाकरे यांनी भाषणात विषय घेतला. माझ्यावर आणि शरद पवारांची टीका केली म्हणून त्याला मी उत्तर दिले. बाकी मी राज ठाकरे बद्दल कधीही बोललेलो नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस