शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१९९३ ची आठवण काढू नका, काही विषय तिथल्या तिथे बंद करायचे असतात – मंत्री जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 22:03 IST

काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये तुमचे योगदान किती हे पहिले दाखवावे. चित्रपट दाखवून काय होणार? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला विचारला आहे.

रणजित इंगळे

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)) यांच्यावर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले असता आता त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी भाष्य केले आहे. आता १९९३ च्या आठवणी काढू नका.  नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली? पेढे कोणी वाटले गुलाल कोणी उधळला. संविधान कोणी नाकारलं. तिरंगा वाद कोणी केला हे सर्व कुठे काढायचे. आता आपण २०२३ मध्ये जाऊ आता उगाच इतिहास खोदून त्यातील सर्व बाहेर काढणे माझ्या दृष्टीने चुकीचा आहे. काही विषय तिथल्यातिथे बंद करायचे असतात असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, कलम ३७० ला बाबासाहेबांचा विरोध असता तर मग ते संविधानात आलं कसं हे मला समजत नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला पण त्याला विरोध झाला त्या हिंदू कोड बिलमध्ये महिलांना पन्नास टक्के वाटा देण्याचं ठरलं होतं परंतु तेव्हाची परिस्थिती पुरुषप्रधान संस्कृती म्हणून मानले जायचे म्हणून त्या वेळच्या राजकीय नेत्यांना आणि सरकारला तेव्हा महिलांना ५० टक्के देणे योग्य वाटलं नव्हतं परंतु ते बाबासाहेबांना वाटले होते. ३७० वरून कुठेही वाद झालेला मी ऐकला नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये तुमचे योगदान किती हे पहिले दाखवावे. चित्रपट दाखवून काय होणार? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

तसेच इशरत जहाला राष्ट्रवादीने मदत केली असं कोणीही म्हटलं नाही. देवेंद्र फडणवीस काही आरोप करतील खरे मानायचे का? आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर काय द्यावे असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. त्याचसोबत मला जेम्स लेनचा वाद पुन्हा घालायचा नाही जेव्हा तो घालायचा होता तेव्हा हे घरात बसले होते. जेम्स लेनचे पुस्तक पहिल्यांदा बाजारात आमच्या काही मित्रांनी आणले आणि त्यात मुख्य माणूस किशोर ढमाले होते. म्हणून या विषयात पुन्हा मला वाद घालायचा नाही. राज ठाकरे यांनी भाषणात विषय घेतला. माझ्यावर आणि शरद पवारांची टीका केली म्हणून त्याला मी उत्तर दिले. बाकी मी राज ठाकरे बद्दल कधीही बोललेलो नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस