शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

...तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 21:22 IST

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या उंचीवरुन सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य

ठाणे: इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकावरुन सध्या सरकारवर टीका सुरू आहे. विरोधकांना जे जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं, यासाठीच आता त्यांच्याकडून टीका केली जात आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावं लागेल, तरी आम्ही ते करु, असंही मुख्यमंत्री म्हणाले. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेला 61 वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याच्या मुद्यावरुन विरोधकांनी फडणवीस सरकारवर टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं. 'बाबासाहेबांची उंची मोजू नका. पुतळ्याच्या आराखड्यात तसूभरही बदल केलेला नाही,' असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी विरोधकांना दिलं. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं इंदू मिलची जमीन स्मारकासाठी दिली नाही. मात्र आपलं सरकार आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या 3 दिवसांमध्ये निर्णय घेतला आणि इंदू मिलची जमीन स्मारकासाठी दिली. आपण जे करुन दाखवलं, ते काँग्रेस-राष्ट्रवादीला जमलं नाही. त्यामुळेच त्यांच्या पोटात दुखतं आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. बाबासाहेबांबद्दल वाद निर्माण करू नका, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी प्रसंगी राज्यदेखील गहाण ठेवू, असं मुख्यमंत्री म्हणाले.मोदी सरकार बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलणार असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जातो. या आरोपांनाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. 'खोटं बोल, पण रेटून बोल, असं सध्या काही जणांकडून सुरू आहे. संविधान आहे, म्हणून आज सर्वकाही आहे. त्यामुळे हे संविधान कोणीच बदलू शकत नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपा सरकार समाजातील सर्व घटकांसाठी काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'मोदींनी अॅट्रॉसिटीचा कायदा मंजूर करुन घेतला. आरक्षण कायम ठेवलं. मराठा समाजालादेखील आम्ही नक्की आरक्षण देऊ. मात्र त्यासाठी इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही,' अशी हमी फडणवीसांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस