शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

मी देवाधर्माचे प्रदर्शन करत नाही, आम्ही प्रबोधनकार वाचलेत; धर्माचा बाजार नको - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 07:51 IST

‘राज ठाकरे यांच्या भाषणात भाजपबद्दल अवाक्षर नव्हते. महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा समावेश नव्हता. भाजपच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे भाषण झाले.

मुंबई :

राज ठाकरे यांच्या भाषणात भाजपबद्दल अवाक्षर नव्हते. महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा समावेश नव्हता. भाजपच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे भाषण झाले. भाजपने दिलेली जबाबदारी ते पार पाडत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणाचा समाचार घेतला. तर, मला माझ्या देवाधर्माचे प्रदर्शन करायला आवडत नाही, असे सांगत नास्तिकतेबद्दलच्या विधानावरही परखड भाष्य केले.

राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत केलेल्या आरोपांचा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून समाचार घेतला. एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यांतून वक्तव्य करून आपले मत व्यक्त करते, तेव्हा ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. भाजपने केलेले मार्गदर्शन भाषणाच्या माध्यमातून ऐकायला मिळाले. त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात. सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा असो की नकला यातून मात्र लोकांची करमणूक होते, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

‘आम्ही प्रबोधनकार वाचले, त्यांच्या कुटुंबातले लोक वाचत नसावेत’शरद पवार नास्तिक असल्याचे राज यांनी म्हटले होते. यावर, मी माझा धर्म आणि देव याबद्दल प्रदर्शन करत नाही. आजपर्यंत १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो असेन. माझ्या निवडणूक प्रचाराचा नारळ कोणत्या मंदिरातून फुटतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा; पण आम्ही कधीही त्याचा गाजावाजा केला नाही. आयुष्यात माझ्यासमोर काही आदर्श आहेत, त्यापैकी प्रबोधनकार ठाकरे हे एक आहेत. प्रबोधनकारांनी देव किंवा धर्म यांच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांवर प्रचंड टीका केली होती. याचा अर्थ त्यांनी धर्माचा अनादर केला नाही; पण देव आणि धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांना चोपण्याचे काम केले. आम्ही प्रबोधनकारांचे लिखाण वाचतो; पण सर्वच जण किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक, ते वाचत नसावेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

मी आणि अजित वेगळे आहोत का? अजित पवारांच्या घरी छापा पडतो; पण सुप्रिया सुळेंच्या नाही, या राज ठाकरे यांच्या विधानावर ते काहीतरी बालिश भाषण करतात. पोरकट आरोप असल्याची संभावना पवार यांनी केली. अजित पवारांकडे काही झाले तर माझ्याकडे झाले, असे आहे. अजित आणि मी वेगळे आहोत का? अजित आणि सुप्रिया बहीण- भाऊ नाहीत का?, अशा शब्दांत पवार यांनी संताप व्यक्त केला. किरीट सोमय्यांची कृती आक्षेपार्ह विक्रांतसाठी पैसे गोळा केले, हे बातम्यातून स्पष्ट दिसते आहे. पैसे गोळा केले तर त्याचा विनियोग काय केला? माझ्या वाचनात आले की, तो निधी पक्षाकडे जमा करण्यात आला. भावनेला हात घालून विक्रांतसाठी पैसे गोळा केले गेले. मग तो एक रुपया असो किंवा अकरा हजार रुपये ते पक्षाकडे का दिले? ते पैसे सैन्य दल किंवा नौदलला देता आले असते. माझ्या मते हे आक्षेपार्ह आहे, असे पवार म्हणाले.

छत्रपतींचेच विचार मांडतो- दोनच दिवसांपूर्वी अमरावतीतील भाषणात २५ मिनिटे महाराजांच्या योगदानावर बोललो. अर्थात मला रोज वृत्तपत्र वाचायची सवय आहे. त्यासाठी लवकर उठावे लागते. खूपवेळा वृत्तपत्रात काय काय लिहिले आहे, हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही. - राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते. शाहू-फुले-आंबेडकर यांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे, असेही पवार म्हणाले.- शिवरायांना घडविण्यात माँ जिजाऊंचे योगदान होते; परंतु पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न केला. तो योग्य नव्हता, असे माझे मत तेव्हाही होते व ते आजही कायम असल्याचे पवार म्हणाले.- एस. टी. कामगारांच्या आंदोलनाला चुकीचे नेतृत्व मिळाले. या चमत्कारिक नेतृत्वाने फक्त माझ्याबाबत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे