शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:53 IST

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजयी झेंडा फडवण्यासाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहन सपकाळ यांनी केले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचाही निवडणुकीत पराभव झाला होता, पण त्यानंतर काँग्रेस पक्ष नव्या जोमाने उभा राहिला, असे सांगत चेन्नीथला यांनी काँग्रेस कधीच संपत नाही, असे ठणकावून सांगितले.

मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, सहप्रभारी यू.बी. व्यंकटेश, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आ. ज्योती गायकवाड यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

'रडायचे नाही, तर लढायचे!'

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आमच्या बाजूने लागले असते, तर आजचा उत्साह अधिक वाढला असता; पण पराभव झाला म्हणून कोणीही खचून जाऊ नये. काँग्रेस कार्यकर्त्याने पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले पाहिजे. रडायचे नाही, तर लढायचे हा बाणा अंगी बाळगला पाहिजे."

सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजयी झेंडा फडकवण्यासाठी ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन केले.

राहुल गांधींचे नेतृत्व दिपस्तंभासारखे

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व आमच्यासाठी दिपस्तंभासारखे आहे. "नफरत छोडो, भारत जोडो" हा नारा देत भयमुक्त समाजासाठी राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढली. संविधानाचे संरक्षण आणि संवर्धन हे त्यांचे स्वप्न आहे.

सपकाळ यांनी जोर देत सांगितले की, "निवडणुकीत हार-जीत होतच असते; पण सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. नकारात्मकता सोडून द्या आणि लढाऊ बाणा अंगी बाळगा. संविधानाला अभिप्रेत असा भारत निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Don't cry, fight! Congress urges action after Bihar election results.

Web Summary : Following Bihar's election, Congress leaders rallied workers to focus on winning Mumbai's municipal elections. They emphasized resilience, drawing inspiration from past leaders and Rahul Gandhi's vision. The call: fight for a constitution-based India.
टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Mumbaiमुंबई