शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

रडायचं नाही लढायचं! ईडी कोठडीतून संजय राऊतांचं विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:42 IST

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांच्या झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले.

मुंबई - पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला एक पत्र लिहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात संसदेत आणि बाहेर माझ्या समर्थनार्थ आवाज उचलला. आता रडायचं नाही तर लढायचं अशा शब्दात राऊतांनी बाळासाहेबांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. 

राऊतांनी पत्र लिहिलंय की, अडचणीच्या काळात तुमच्यासोबत कोण आहे हे कळतं. केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावापुढे मी झुकणार नाही. अंतिम श्वासापर्यंत मी लढत राहीन. कुठल्याही प्रकारच्या दबावापुढे मी शरण जाणार नाही. योग्य वेळ आल्यावर आमचाच विजय होणार आहे. आमच्या विचारांचा विजय होईल आणि देश योग्य दिशेने पुढे जाईल असंही त्यांनी सांगितले आहे. 

त्याचसोबत आता ध्येर्याने काम करावं लागेल. संयम ठेवावा लागेल. परंतु वेळ आल्यानंतर बाजी आमचीच असेल. पत्राद्वारे राऊतांनी काँग्रेस, सीपीएम आणि अन्य विरोधी पक्षांचे धन्यवाद मानले आहेत. न्यायासाठी माझी लढाई सुरूच राहील. वंदनीय हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे रडायचं नाही लढायचं. या लढाईत मला साथ दिल्याबद्दल मी आभारी आहे असं पत्र राऊतांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पाठवलं आहे. 

८ ऑगस्टपर्यंत राऊतांचा मुक्काम तुरुंगातचपत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांच्या झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर, न्यायलयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. आता, राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी ४ दिवस वाढला आहे. तत्पूर्वी राऊत यांनी ईडी कोठडीवर काही आरोप केले आहेत.

प्रियंका गांधींची टीका"धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य" असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य आहे. संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला, कारण ते भाजपाच्या छळ-कपटाच्या राजकारणाला घाबरले नाहीत आणि त्यांचा सामना त्यांनी केला. भीती आणि धमकी भित्र्यांची हत्यारं आहेत, सत्याच्या वारासमोर हे टिकणार नाहीत" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.  

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेस