शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी निकालाच्या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 19:41 IST

दहावी, बारावीच्या निकालाबाबत साेशल मीडियावर विविध तारखा जाहीर हाेत असल्याने आता बाेर्डाकडून या तारखांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी ,बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला असून परीक्षांचे निकाल लांबणार आहेत. परंतु, निकालाच्या विविध तारखा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. मात्र, या तारखांवर व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी केले आहे.

राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असताना कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात तो रद्द करावा लागला. तसेच शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शासनाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आला नाही. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक शाळा महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा करत आहेत. परंतु, सर्वाधिक कोरोना प्रभावित भागातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर ,अमरावती, नाशिक , लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे इयत्ता दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. या सर्व विभागीय मंडळांची निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. एका विभागाचा निकाल तयार करण्यास उशीर झाला तरीही राज्याचा निकाल लांबतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून फिजिकल डिस्टंन्सिगचे नियम पाळून निकाल तयार करण्याचे काम आता वेगाने केले जात आहे. परंतु, निकाल केव्हा जाहीर करता येऊ शकतो; याबाबतची आवश्यक असणारी माहिती (डेटा) अद्याप राज्य मंडळाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे निकालाची तारीख सद्यस्थितीत राज्य मंडळाला सांगता येत नाही, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले. मात्र, सोशल मीडियावर निकालाच्या तारखा प्रसिद्ध होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

दहावी-बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा व तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून यथावकाश निकालाच्या तारखांबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाईल. - डॉ.शकुंतला काळे , अध्यक्ष ,राज्य शिक्षण मंडळ

 

 

टॅग्स :Result Dayपरिणाम दिवसPuneपुणेexamपरीक्षाEducationशिक्षण