शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दहावी, बारावी निकालाच्या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 19:41 IST

दहावी, बारावीच्या निकालाबाबत साेशल मीडियावर विविध तारखा जाहीर हाेत असल्याने आता बाेर्डाकडून या तारखांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी ,बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला असून परीक्षांचे निकाल लांबणार आहेत. परंतु, निकालाच्या विविध तारखा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. मात्र, या तारखांवर व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी केले आहे.

राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असताना कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात तो रद्द करावा लागला. तसेच शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शासनाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आला नाही. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक शाळा महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा करत आहेत. परंतु, सर्वाधिक कोरोना प्रभावित भागातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर ,अमरावती, नाशिक , लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे इयत्ता दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. या सर्व विभागीय मंडळांची निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. एका विभागाचा निकाल तयार करण्यास उशीर झाला तरीही राज्याचा निकाल लांबतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून फिजिकल डिस्टंन्सिगचे नियम पाळून निकाल तयार करण्याचे काम आता वेगाने केले जात आहे. परंतु, निकाल केव्हा जाहीर करता येऊ शकतो; याबाबतची आवश्यक असणारी माहिती (डेटा) अद्याप राज्य मंडळाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे निकालाची तारीख सद्यस्थितीत राज्य मंडळाला सांगता येत नाही, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले. मात्र, सोशल मीडियावर निकालाच्या तारखा प्रसिद्ध होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

दहावी-बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा व तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून यथावकाश निकालाच्या तारखांबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाईल. - डॉ.शकुंतला काळे , अध्यक्ष ,राज्य शिक्षण मंडळ

 

 

टॅग्स :Result Dayपरिणाम दिवसPuneपुणेexamपरीक्षाEducationशिक्षण