शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 18:42 IST

'महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला अभूतपूर्व विजय मिळवून दिला, आता त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आहे.'

Nitin Gadkari In BJP Convention: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) महाराष्ट्र भाजपच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले कार्यकर्ते आणि निवडून आलेल्या नेत्यांना एक मोलाचा सल्ला दिला. 'फक्त निवडणुका जिंकून समाधानी न राहता, जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचे आहे', असे नितीन गडकरी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणतात, 'महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. त्यांनी शिवाजी महाराजांसारखे जनहिताचे सरकार दिले. आता आपल्यावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि सामाजिक एकोपा आणण्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील विजयानंतर आता राज्यात सुराज्य आणायचे आहे. सामजिक परिवर्तन सत्तेच्या माध्यमातून घडवून आणले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया गडकरींनी यावेळी दिली.

आपल्या कृतीतून ओळख निर्माण होते'निवडणुकीतील जय-पराजयाने कोणी लहान किंवा मोठा होत नाही. आपली ओळख आपल्या कामावरुनच ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक हरले, पण त्यांच्या विरोधातील विजयी उमेदवार कोणालाच माहीत नाही. याउलट, बाबासाहेब जगभर ओळखले जातात. महाराष्ट्रात जातीच्या राजकारणातून द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, पण माणूस त्याच्या कामाने मोठा होतो, जातीने नाही.' 

निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका'काँग्रेसचा पराभव करून समाधानी राहू नका. तुम्हाला लोकांच्या जीवनात बदल घडवून आणायचा आहे, नाहीतर तुम्ही काय केले? असा सवाल लोक विचारतील. त्यांनी जे केले, तेच तुम्ही करू नका. आपल्याला आधीच्या सरकारांपेक्षा दहापट चांगले काम करायचे आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे. केवळ स्मार्ट शहरे नसून स्मार्ट गावे व्हायला हवीत. लोक मजबुरीने शहरात येतात. कार्यक्रमानंतर मी काश्मीरला जाणार आहे. उद्या पंतप्रधान मोदींसोबत बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. मी काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांनी मला सांगितले की तुम्ही इतके चांगले रस्ते बनवलेत, पर्यटक तिपटीने वाढले आहेत. लोक वाढले. आज महाराष्ट्रात किती मोठी पर्यटन स्थळे आहेत? आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे ही सर्वात मोठी देशभक्ती आहे,' असंही गडकरी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस