शहरं
Join us  
Trending Stories
1
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
2
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
3
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
4
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
5
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
6
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
7
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
8
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
9
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
10
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
11
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
12
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
13
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
14
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
15
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
16
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
17
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
18
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
19
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
20
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का? नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 15:14 IST

सावित्रीबाई फुलेंबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना फाशी लावणार का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

संभाजी भिडे यांचे महापुरुषांबद्दलची विधाने अवमानकारक असतात. भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. संभाजी भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी आधीच विधिमंडळात केली आहे, असे पटोले म्हणाले. 

सावित्रीबाई फुलेंबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना फाशी लावणार का? भीमा कोरेगाव घटना घडली, त्यासाठी भिडे जबाबदार होते. दोन तीन दिवसांत भिडे यांना अटक केली नाही तर आम्ही विधिमंडळात हे प्रश्न उचलू असा इशारा पटोले यांनी दिला.  

भाजप भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचा मणिपूर करू पाहत आहे का?  नरेंद्र मोदी खाजगी पुरस्कार स्वीकारत आहेत. मोदी हे पुरस्कार स्वीकारून पंतप्रधान पदाचा अवमान करत आहेत. काँग्रेस भाजपाविरोधात लढा देत आहे. इतर पक्षांनी (शरद पवार) यांनी काय करावे, हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे. मात्र, दुसऱ्या पक्षांनी काय करावे? हे त्यांनीच ठरवायचे आहे, असे पटोले म्हणाले. 

नागपुरात विकासाच्या नावावर शहर भकास केले. भाजपने नागपुरात झाडे कापली, सौंदर्य नष्ट केले. मला चंद्रपूर माहीत आहे. गेल्या दोन वर्षांत पूररेषा ओलांडून एकही घर बांधलेले नाही. भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणाचे बांध बांधले, त्यामुळे महाराष्ट्रात पूर येत आहे. नाणार जवळ अनेकांनी जमिनी घेतल्या आहेत. जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल. हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे. नानार प्रकल्प या ठिकाणीच होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुजरातमधील लोकांनी तिथे जमिनी घेतल्या आहेत. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हे प्रकार आहे. नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांचे नाव शासनाने जाहीर करावे. त्यांच्याकडे यादी आहे, असे पटोले म्हणाले. 

- महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था योग्य नाही. फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात ही लोकं सुरक्षित नाहीत. नागपुरात एका दिवसात चार लोकांची हत्या होत आहे. महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहे, त्यांची परीक्षा घेऊ नका. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी यांना निधी दिले नाहीत, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही पटोले यांनी दिला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीcongressकाँग्रेस