शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का? नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 15:14 IST

सावित्रीबाई फुलेंबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना फाशी लावणार का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

संभाजी भिडे यांचे महापुरुषांबद्दलची विधाने अवमानकारक असतात. भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. संभाजी भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी आधीच विधिमंडळात केली आहे, असे पटोले म्हणाले. 

सावित्रीबाई फुलेंबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना फाशी लावणार का? भीमा कोरेगाव घटना घडली, त्यासाठी भिडे जबाबदार होते. दोन तीन दिवसांत भिडे यांना अटक केली नाही तर आम्ही विधिमंडळात हे प्रश्न उचलू असा इशारा पटोले यांनी दिला.  

भाजप भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचा मणिपूर करू पाहत आहे का?  नरेंद्र मोदी खाजगी पुरस्कार स्वीकारत आहेत. मोदी हे पुरस्कार स्वीकारून पंतप्रधान पदाचा अवमान करत आहेत. काँग्रेस भाजपाविरोधात लढा देत आहे. इतर पक्षांनी (शरद पवार) यांनी काय करावे, हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे. मात्र, दुसऱ्या पक्षांनी काय करावे? हे त्यांनीच ठरवायचे आहे, असे पटोले म्हणाले. 

नागपुरात विकासाच्या नावावर शहर भकास केले. भाजपने नागपुरात झाडे कापली, सौंदर्य नष्ट केले. मला चंद्रपूर माहीत आहे. गेल्या दोन वर्षांत पूररेषा ओलांडून एकही घर बांधलेले नाही. भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणाचे बांध बांधले, त्यामुळे महाराष्ट्रात पूर येत आहे. नाणार जवळ अनेकांनी जमिनी घेतल्या आहेत. जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल. हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे. नानार प्रकल्प या ठिकाणीच होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुजरातमधील लोकांनी तिथे जमिनी घेतल्या आहेत. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हे प्रकार आहे. नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांचे नाव शासनाने जाहीर करावे. त्यांच्याकडे यादी आहे, असे पटोले म्हणाले. 

- महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था योग्य नाही. फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात ही लोकं सुरक्षित नाहीत. नागपुरात एका दिवसात चार लोकांची हत्या होत आहे. महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहे, त्यांची परीक्षा घेऊ नका. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी यांना निधी दिले नाहीत, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही पटोले यांनी दिला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीcongressकाँग्रेस